Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात चार दिवसांत ११५ हेक्टरचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : अहिल्यानगर जिल्ह्यात चार दिवसांत झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने ११५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले असून जवळपास ३५ गावांत फटका बसला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात चार दिवसांत झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने ११५ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले असून जवळपास ३५ गावांत फटका बसला आहे. अकोले व नेवासा तालुक्यांत प्रत्येकी एक मृत्यू झाला. अजूनही दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात मॉन्सूनपूर्व पावसाने नुकसान होत आहे. जिल्ह्यात ९ ते १२ मे या कालावधीत झालेल्या वादळ, पावसाने पाथर्डी, अकोले आणि नगर तालुक्यातील साधारण ३५ गावांत शेती पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सााधारण २५० शेतकऱ्यांचे ११५.५५ हेक्टरवरील फळबाग, भाजीपाल्यासह चारा पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपीट व वादळाचा तडाखा सुरू आहे. एप्रिलमध्ये तीन वेगवेगळ्या दिवशी अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर आता मे मध्येदेखील मॉन्सूनपूर्वचा तडाखा सुरू आहे. मेमध्ये सलग चार दिवस वेगवेगळ्या भागांत पावसाचा तडाखा बसला. विशेषतः पाथर्डी, अकोले आणि नगर तालुक्यात ३५ गावांमधील २५० शेतकऱ्यांचे ११५.५५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

यात १८३ शेतकऱ्यांचे ७० हेक्टर वर ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर ६७ शेतकऱ्यांचे ४५.५५ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्यात गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात ९ ते १२ मे या कालावधीत पाथर्डी तालुक्यातील २४ गावांत १०६ शेतकऱ्यांचे ७३.६० हेक्टरवर, अकोले तालुक्यातील सहा गावांत ७३ शेतकऱ्यांचे १८.३५ हेक्टर, अहिल्यानगर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांचे पाच हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.

वादळ व पावसाने प्रामुख्याने आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू, लिंब आणि केळी या फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मका, कांदा, टोमॅटो, उन्हाळी बाजरी, मिरची पिकांचेही नुकसान झाले. नेवासे तालुक्यात ३, कोपरगाव २, अकोले १ आणि शेवगाव तालुक्यातील २ अशा आठ घरांची पडझड झाली आहे. पाथर्डीत दोन म्हशींसह एक गाय दगावली. तर अकोले तालुक्यात झाड पडून एकाचा तर नेवासे तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

चार दिवसांत झालेल्या पावसाने नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विजेच्या उपकरणे, मोबाइल या साधनांचा वापर करणे टाळावे.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT