Kharif Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Onion Management : खरीप, रांगडा हंगामासाठी कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. राजीव काळे,डॉ. शैलेंद्र गाडगे, विजय महाजन

Onion Nursery Management : खरीप हंगामात कांद्याची उत्पादकता पावसाचे असंतुलित प्रमाण व हवामानाची प्रतिकूल स्थिती यामुळे रब्बी हंगामापेक्षा कमी असते. परंतु या काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे चांगला आर्थिक फायदा होतो.

खरीप हंगामासाठी लागवडीसाठी शिफारस केलेले कांद्याचे वाण व सुधारित तंत्रज्ञान वापरून चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचनालयाद्वारे खरीप व रांगडा हंगामासाठी कांद्याचे विविध वाण विकसित केले आहेत.

कांदा वाण

भीमा रेड

खरीप तसेच रांगडा व रब्बी हंगामामध्ये पुनर्लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस तयार होते.

सरासरी उत्पादन ः २० ते २२ टन प्रति हेक्टरपर्यंत.

या जातीची साठवणक्षमता काढणीनंतर तीन महिन्यांपर्यंत आहे.

फुलकिड्यांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

भीमा सुपर

खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०० ते

१०५ दिवसांत तसेच रांगडा हंगामामध्ये लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन ः खरीप हंगामामध्ये २० ते २२ टन प्रति हेक्टर.

साठवणक्षमता ३ महिन्यांपर्यंत असते.

जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे असतात. त्यामुळे ही जात कांद्याचे निर्जलीकरण करून तळलेले काप (रिंग) तसेच सलाड बनविण्यासाठी उत्तम आहे.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

भीमा डार्क रेड

खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन २० ते २२ टन प्रति हेक्टर.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

भीमा राज

खरीप व रांगडा हंगामासाठी उपयुक्त आहे.

खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत, तर रांगडा व रब्बी हंगामामध्ये लागवडीनंतर ११५ ते १२० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन (हेक्टरी) ः खरीप हंगामामध्ये २४ ते २६ टन, रांगडा हंगामात ३० ते ३५ टन.

भीमा शक्ती

खरीप व रांगडा हंगामासाठी भीमा शक्ती या लाल कांद्याची जात उपयुक्त आहे.

लागवडीनंतर कांदा १२५ ते १३० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन ः हेक्टरी ३५ ते ४० टन.

या जातीच्या कांद्याची साठवणक्षमता ५ ते ६ महिने असते.

फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

भीमा सफेद

खरीप हंगामासाठी पांढऱ्या रंगाची ही जात उपयुक्त आहे.

लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन : हेक्टरी १८ ते २० टन.

खरीप हंगामात साठवणुकीत ही जात १ ते दीड महिन्यापर्यंत टिकते.

प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त आहे.

फुलकिड्यांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

भीमा शुभ्रा

खरीप हंगामासाठी पांढऱ्या रंगाची उपयुक्त जात आहे.

खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर ११० ते ११५ दिवसांत, तर रांगडा हंगामामध्ये लागवडीनंतर १२० ते १३० दिवसांत काढणीस येतो.

सरासरी उत्पादन ः खरीप हंगामामध्ये १८ ते २०

टन, तर रांगडा हंगामामध्ये ३६ ते ४२ टन प्रति हेक्टर येते.

रोपवाटिका व्यवस्थापन

जमीन

पाण्याचा निचरा होणारी उताराची जमीन निवडावी.

१ हेक्टर कांदा लागवडीसाठी पाच गुंठे क्षेत्रामध्ये रोपवाटिका तयार करावी.

गादीवाफे

रोपवाटिकेसाठी १.५ सेंमी उंच, १.२ मीटर रुंदीचे आणि ६० मीटर लांब (सोयीनुसार) गादीवाफे तयार करावेत.

बियाणे :

हेक्टरी ५ ते ७ किलो.

बीजप्रक्रिया :

थायरम किंवा कार्बेन्डाझिम २ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे.

पेरणी :

साधारण ५ ते ७.५ सेंमी अंतरावर ओळीमध्ये १ ते १.५ सेंमी खोलीवर बियाणे पेरावे.

खत व्यवस्थापन

वाफे तयार करण्यापूर्वी ५०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये १.२५ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी मिसळून टाकावे.

२:१:१ किलो नत्र:स्फुरद:पालाश याप्रमाणे द्यावे. पेरणीनंतर १५ आणि २५ दिवसांनी प्रत्येकी १ किलो नत्र द्यावे. (४ किलो १०:२६:२६ आणि २ किलो युरिया प्रत्येकी १५ आणि २५ दिवसांनी)

तण व्यवस्थापन

कांद्याचे बी पेरल्यानंतर रोप उगवण्यापूर्वी वाफ्यांवर पेंडीमिथॅलीन २ मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी एकदा खुरपणी करावी.

ठिबक सिंचन

प्रत्येक वाफ्यामध्ये इनलाईन ड्रीपर असणाऱ्या १६ मिमी व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सेंमी असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.

तुषार सिंचन

दोन लॅटरलमध्ये ६ मीटर अंतर ठेवावे. तसेच ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता नोझलमध्ये असावी. जास्तीचे पाणी शेताबाहेर काढून टाकावे. जास्त पाण्यामुळे रोप मरण्याची शक्यता असते.

ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय नसेल तर पाटपाण्याने गादीवाफ्याच्या चारही बाजूंनी सरीमध्ये पाणी द्यावे.

पीक संरक्षण

फुलकिडे : (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

फिप्रोनिल १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फान २ मिलि

मर रोग नियंत्रणासाठी, (आळवणी प्रति लिटर पाणी)

मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.

काळा किंवा तपकिरी करपा नियंत्रणासाठी, (फवारणी : प्रतिलिटर पाणी)

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझॉल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.

रोपांची पुनर्लागण

खरीप हंगामात पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी, तर रांगडा हंगामात ४५ ते ५० दिवसांनंतर रोपे पुनर्लागणीकरिता तयार होतात.

रोप उपटण्याच्या २ ते ३ दिवसआधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे.

पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापावा.

कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता, कार्बोसल्फॉन २ मिलि अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी द्रावणात रोपांची मुळे दोन तास बुडवून नंतर लागवड करावी.

- डॉ. राजीव काळे, ९५२१९७८५८७ (वरिष्ठ शास्रज्ञ, कांदा व लसूण संशोधन संचनालय, राजगुरुनगर, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील पीकपेरा नोंदणी ६२ टक्क्यांवर थांबली

Rain Update : परभणी, हिंगोलीत २५ मंडलात सरासरीहून कमी पाऊस

Water Scarcity : वसई-विरारकरांची पाणी समस्या मिटणार

Paddy Disease : भातावर बगळ्या, तर नागलीवर करप्याचा प्रादुर्भाव

Dog Bite : श्वान दंश टाळण्यासाठी हात खाली ठेवा, जमिनीकडे पहा ः डॉ. भिकाने

SCROLL FOR NEXT