Fruit farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew : सिंधुदुर्गात आंबा, काजूला पालवी फुटण्यास सुरुवात

जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून हे वातावरण आंबा, काजू बागांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले असून हे वातावरण आंबा, काजू बागांच्या दृष्टीने अनुकूल मानले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस लांबला. त्यामुळे बागायतीचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

दरम्यान पाऊस थांबल्यानंतर दहा-बारा दिवसांपूर्वी थंडीला सुरुवात झाली; मात्र थंडी दोनच दिवस पडली आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही भागांत पाऊसदेखील पडला; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे.

परंतु, गुरुवारी थंडीत चांगलीच वाढ झाली. आंबा, काजू बागांसाठी थंडी आवश्यक होती. वाढलेली थंडी बागांच्या दृष्टीने अनुकूल मानली जात आहे. थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास चांगली पालवी येईल, अशी अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Damage: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत द्या

Crop Insurance: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख ७ हजारांवर अर्ज

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

SCROLL FOR NEXT