Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey In Akola : अकोला जिल्ह्यात नुकसानीच्या कामांना वेग

Crop Damage Update : अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे पंचनामे जोमाने सुरू आहेत.

Team Agrowon

Akola Crop Loss News : अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे पंचनामे जोमाने सुरू आहेत. आतापर्यंत बार्शीटाकळी तालुक्यात हे काम पूर्ण झाले असून इतर ठिकाणी वेगाने पंचनामे केले जात आहेत.

अवकाळी पावसामुळे जिल्हयात २६ व २७ एप्रिल रोजी पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ५६ गावांना फटका बसलेला आहे.तीन हजार ६६५ हेक्टरवरील पिके बाधित झाली. २८ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या पावसामुळे अकोट, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस झाला. मार्च महिन्यात ६ व ७ मार्च , ९ मार्च, तसेच १५ ते १९ मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील गहू व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे.

गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे ९ हजार २६८.६८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले.

दरम्यान एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. २६ व २७ एप्रिलला पातूर, बाळापूर व बार्शीटाकळी तालुक्यात पाऊस झाल्याने तीन हजार ६६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद झालेली आहे. यामुळे सर्वाधिक नुकसान एकट्‍या पातूर तालुक्यात झाले.

२८ ते ३० एप्रिल दरम्यान ९०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून अद्याप बार्शीटाकळी तालुक्याचे पंचनामे पूर्ण झाले आहे, तर इतर तालुक्यात काम सुरु आहे. २६ व २७ एप्रिलच्या अवकाळी पावसाने पातूर तालुक्यातील ३१ गावांना फटका बसला.

त्यासोबतच तीन हजार २३.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाळापूर तालुक्यात अवकाळीमुळे एका गावातील १.५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. त्या प्रामुख्याने फळपिकाचा समावेश आहे. र्शीटाकळी तालुक्यातील २४ गावांमध्ये अवकाळीमुळे नुकसान झाले. ६४० हेक्टरवरील क्षेत्र या पावसामुळे बाधित झाले आहे.

२८ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या पावसामुळे अकोट, मूर्तीजापूर व बार्शीटाकळी तालुक्यातील अंदाजे ९०० हेक्टरवरील पिके बाधित झालेली. यात ६९० शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तींचे पंचनामे यंत्रणांकडून सुरु आहेत. यात बार्शीटाकळी तालुक्याने पुढाकार घेत पंचनामे पूर्णत्वास नेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21 Installment : पीएम किसानच्या २१ हप्त्याची हप्त्याची तारीख ठरली; नोंदणीसाठी कृषी मंत्रालयाचे आवाहन

Sugarcane Rate Protest: कर्नाटकातील मुधोळमध्ये ऊसदर आंदोलनाचा भडका

Micro Irrigation: ‘सूक्ष्म सिंचन’साठी इंदापुरात मोहीम

Crop Processing Industry: पारंपरिक शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा: पाटील

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहि‍णींना

SCROLL FOR NEXT