Mangaon News: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने माणगाव शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे नदी, नाले, गटारे आणि शेतीमध्ये पाणी तुंबले आहे. शहरातील गटारांतून वाहणारे सांडपाणी आणि मलमूत्र खांदाड गावात शिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गटाराचे पाणी शेतजमिनीत शिरत असल्याने दरवर्षी भातशेती नापीक होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आतापर्यंत गावातील शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
माणगाव शहरातील मोरबा रस्ता, कमल फर्निचर, एसटी बसस्थानक येथील दुतर्फा असलेल्या गटाराचे सांडपाणी आणि मलनिस्सारण वाहिनीतील पाणी पावसाच्या पाण्याबरोबर खांदाड गावात येत असल्याने सध्या सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मोरबा रस्त्यावरील गटारांची साफसफाई दोन वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या महामार्गावरील गटारात कचरा साचल्याने तुंबले आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही उपाययोजना न केल्याने सांडपाणी जाण्यासाठी मोऱ्यांचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे सांडपाणी उलट फिरून खांदाड गावातील लोकांच्या दारापर्यंत पोहोचते. पावसाचा जोर वाढल्यास हे सांडपाणी घरातही शिरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सतत पाणी तुंबल्याने ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.