Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Import: कापूस आयात दुपटीने वाढणार!

India Cotton Market: चालू हंगामात कापसाची आयात दुपटीहून अधिक वाढेल आणि ३३ लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News: देशातील कापूस उत्पादन २९१ लाख गाठींवरच स्थिरावले आहे. मात्र उद्योगांचा कापूस वापर कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात कापसाची आयात दुपटीहून अधिक वाढेल आणि ३३ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २५ लाख गाठी कापूस भारतात आला. गेल्या वर्षी १५ लाख गाठींचीच आयात झाली होती. भारताची कापूस आयात वाढणार आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) व्यक्त केला. दुसरीकडे वाढत्या कापूस आयातीमुळे दरात शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी दिसत नाही.

सीएआयने आपल्या सुधारित अंदाजात म्हटले आहे, की देशातील कापूस उत्पादन यंदा २९१ लाख गाठींवर स्थिरावले. गेल्या महिन्यात २९४ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज होता महाराष्ट्रातील उत्पादनात घट स्पष्ट झाल्याने देशाच्या उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आला. तर देशातील कापूस वापर ३१५ लाख गाठींवर राहणार आहे. म्हणजेच देशात कापसाला मागणी आहे. त्यामुळे भारतात कापूस आयात वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भावही कमी आहेत. त्यामुळे कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क असूनही पडतळ बसत असल्याचे आयातदारांनी सांगितले.

आयात-निर्यातीचा ताळेबंद

यंदा भारताची आयात वाढणार आहे तर निर्यात कमी होणार आहे. मागील वर्षी भारताने २८ लाख गाठी कापूस निर्यात केली होती. मात्र यंदा निर्यात १६ लाख गाठींवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. तर ३१ मार्चपर्यंत देशातून ९ लाख गाठी कापसाची निर्यात झाली आहे. तसेच गेल्या वर्षी भारताने केवळ १५ लाख गाठी कापूस आयात केली होती. यंदा ही आयात ३३ लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २५ लाख गाठी कापूस आयात झाला, असेही सीएआयने म्हटले आहे.

सीसीआय सर्वांत मोठा स्टॉकिस्ट

देशातील बाजारात ३१ मार्चपर्यंत २५१ लाख गाठी कापसाची आवक झाली. यापैकी १०० लाख गाठी कापूस सीसीआयने खेरदी केला. मागील हंगामातील ३० लाख गाठी शिल्लक होत्या. म्हणजेच ३१ मार्चपर्यंत आवक आणि शिल्लक असा एकूण २८१ लाख गाठी कापूस बाजारात होता. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत १७० लाख गाठी कापसाचा वापर झाला. तर सीसीआयचा कापूस अजून स्टॉकमध्ये आहे. यंदाच्या हंगामातला आणखी ४० लाख गाठी कापूस बाजारात यायचा आहे. म्हणजेच सध्या शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांपेक्षा सीसीआयकडे सर्वाधिक स्टॉक आहे. त्यामुळे सीसीआयच्या कापूस विक्रीनुसार बाजारात बदल दिसतील.

सीएआयच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात आधीच्या अंदाजाच्या तुलनेत ५ लाख गाठींची कपात करण्यात आली. तर तेलंगणातील उत्पादन १ लाख गाठीने वाढले. त्यामुळे देशतील उत्पादनाचा अंदाज २९१ लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. दुसरीकडे उद्योगांचा वापर स्थिर आहे. त्यामुळे आयात वाढणार आहे.
अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT