Cabinet Decision Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition Bill: भूसंपादन मोबदला विलंब व्याजात कपातीचे विधेयक आणणार

Maharashtra Cabinet Decision: राज्य सरकारने भूसंपादनाच्या मोबदल्यात विलंब झाल्यास देण्यात येणाऱ्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून, हे दर आता १५ टक्क्यांवरून आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत मर्यादित केले जाणार आहेत. मंत्रिमंडळाने यास मंजुरी देत विधेयक विधिमंडळात मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासाहेब पाटील

Bhumi Adhigrahan Kayda: सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यास विलंब झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज १५ टक्क्यांवरून आठ ते नऊ टक्क्यांवर आणण्याचे विधेयक आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मांडण्यास मंगळवारी (ता. १५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अधिक दराने व्याज दिल्याने सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने प्रकल्प खर्चातही वाढ होत असल्याचे कारण देत हे विधेयक आणण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य सरकारने सरसकट एकच व्याजदर देण्यासाठी बँकांच्या व्याजदरापेक्षा एक टक्क्याने जास्त व्याज देत असल्याचे सांगण्यात आले आहे. विविध सार्वजनिक, शासकीय, निमशासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यासाठी उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ नुसार भरपाई देण्यात येते. या कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या भूसंपादनामुळे जमीन मालकांना चांगला मोबदला आणि पुनर्वसन आणि पुनर्स्थापना होत असल्याने विरोधाचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

या अधिनियमात जमीन मालकांना भूसंपादनाचा मोबदला देण्यास विलंब झाल्यास कलम ३०(३) अनुसार १२ टक्के आणि कलम ७२ आणि कलम ८० अनुसार नऊ टक्के आणि १५ टक्के व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यामुळे शासनाच्या तिजोरीवर बोजा पडून प्रकल्पांच्या मूळ खर्चात वाढ होत असल्याचे निर्णयात म्हटले आहे.

या व्याजदरात बदल करून भूसंपादनाचा मोबदला देण्यास विलंब झाल्यास त्या रकमेवर सरसकट एकाच दराने व्याज देण्यात येईल. हा दर बँकासाठीच्या व्याज दराहून एक टक्के अधिक असेल. थकित मोबदल्यावर या दराने दरसाल दर शेकडा प्रमाणे व्याज आकारण्याची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याबाबत विधेयक विधिमंडळात मांडण्यात येईल.

बँकांचे व्याजदर साडेसहा ते आठ टक्क्यांपर्यंत

रिझर्व्ह बँकेने पतधोरणात बदल करत सलग दोन वेळा रेपो दरात अनुक्रमे पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे कर्जावरील व्याज कमी झाले आहे. त्यानंतर काही बँकांनी ठेवींवरील व्याजही कमी केले आहे. सध्या गृहकर्जाचा दर ८.१५ टक्क्यांपासून साडेनऊ टक्क्यापर्यंत आहे. तर ठेवींवर व्याजदर साडेसहा टक्क्यांपासून साडेसात टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यापेक्षा एक टक्का म्हणजे साडेसात ते साडेआठ टक्क्यांपर्यंतच विलंबावरील व्याज मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT