Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : नरखेडमधील १० हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले

Crop Damae : खरीप हंगामातील नुकसानीबाबत विहित मुदतीत विमा कंपनीकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर देखील चार महिन्यांचा कालावधी लोटूनही दहा हजारांवर दावे विमा कंपनीने टाळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Nagpur News : नागपूर : खरीप हंगामातील नुकसानीबाबत विहित मुदतीत विमा कंपनीकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर देखील चार महिन्यांचा कालावधी लोटूनही दहा हजारांवर दावे विमा कंपनीने टाळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या विषयावर गुरुवारी (ता. १३) बैठकीचे आयोजन केले आहे.

नैसर्गिक आपत्तीत खरिपातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी तत्काळ आणि विहित मुदतीत किंवा कंपनीला नुकसानीची पूर्वसूचना दिली. पण याला चार महिने होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पीकविमा कंपनीचा प्रतिनिधी फिरकलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगामात नरखेड तालुक्यातील ३७ हजार २६६ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला होता. यातील २० हजार ३१० शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून कंपनीला केल्या. पण कंपनीने केवळ ९ हजार ३३६ शेतकऱ्यांच्या तक्रारींचे सर्वेक्षण केले तर १० हजार ९७४ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण न करता त्यांच्या तक्रारी अमान्य केल्या.

अशातच ज्यांचे दावे मान्य केले त्यांनादेखील अद्याप भरपाई मिळालेली नाही. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमित हानी होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने पीकविमा योजना राबविली जात आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकविमा संरक्षित करण्यासाठी अवघा एक रुपयाचा भरणा करावा लागला.

खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर हा ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीचे संयोजक ॲड. अविनाश काळे यांनी नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सात जानेवारीला तक्रार दिली होती. याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पत्र काढत या विषयावर  

एकट्या नरखेड तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारी पीकविमा कंपनीने नाकारणे हे खरेच आश्चर्यकारक आहे. तर मग जिल्हा व विदर्भातील मोठ्या प्रमाणात तक्रारी नाकारण्यात आल्या असाव्यात. यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत व याचे पाहिले पाऊल म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक आहे. यात सर्वच विषय मांडण्यात येतील व यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
- ॲड. अविनाश काळे,
संयोजक, लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती, नागपूर

मी २०२४ च्या खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची पेरणी केली होती. तसेच विमाही काढला होता. पण सोयाबीनचे पीक हाती येण्या अगोदरच १२ व १३ सप्टेंबर २०२४ ला वादळी पाऊस पडल्यामुळे  पिकाचे संपूर्ण नुकसान झाले. यामुळे मी पीकविमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार केली. पण माझी तक्रार नाकारण्यात आली. याबाबत माहिती घेतली तर पाऊस न झाल्याचे सांगण्यात आले. पण जेव्हा पाऊस झाला तेव्हा त्याचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले तर कंपनीने तक्रार कशी नाकारली, असा सवाल उपस्थित होत आहे.
- गुणेश्‍वर बंदे, शेतकरी

एकट्या नरखेड तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारी पीकविमा कंपनीने नाकारणे हे खरेच आश्चर्यकारक आहे. तर मग जिल्हा व विदर्भातील मोठ्या प्रमाणात तक्रारी नाकारण्यात आल्या असाव्यात. यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत व याचे पाहिले पाऊल म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक आहे. यात सर्वच विषय मांडण्यात येतील व यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
- ॲड. अविनाश काळे,
संयोजक, लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती, नागपूर

मी २०२४ च्या खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची पेरणी केली होती. तसेच विमाही काढला होता. पण सोयाबीनचे पीक हाती येण्या अगोदरच १२ व १३ सप्टेंबर २०२४ ला वादळी पाऊस पडल्यामुळे  पिकाचे संपूर्ण नुकसान झाले. यामुळे मी पीकविमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार केली. पण माझी तक्रार नाकारण्यात आली. याबाबत माहिती घेतली तर पाऊस न झाल्याचे सांगण्यात आले. पण जेव्हा पाऊस झाला तेव्हा त्याचे सर्व्हेक्षण कृषी विभागाने केले तर कंपनीने तक्रार कशी नाकारली, असा सवाल उपस्थित होत आहे.
- गुणेश्‍वर बंदे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT