पपई दर
पपई दर  
बाजारभाव बातम्या

पपई दरांबाबत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून कोंडी सुरुच

टीम अॅग्रोवन

धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत आहे. या प्रकाराकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असून, व्यापारी मनमानी करीत आहेत. मागील ४५ दिवसांत पपईचे दर १४ ते १६ रुपये प्रतिकिलोवरून तीन रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. आता उत्पादन खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. प्रशासनाने हस्तक्षेप करून ही अडचण दूर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.  पपईचे दर दोन दिवसांपूर्वी पाच ते चार रुपये प्रतिकिलो, असे थेट जागेवरच शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु दोन दिवसांत पुन्हा दर कमी करण्यात आले असून, तीन रुपये प्रतिकिलो, असे दर व्यापाऱ्यांनी केले आहेत. दर कुठलीही बाजार समिती जाहीर करीत नाही. शहादा (जि. नंदुरबार) व मध्य प्रदेशातील व्यापारी दर ठरवीत असून, कमी दरात पपई दिली नाही तर खरेदीच ठप्प करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. जे खरेदीदार आहेत, त्यांच्याकडून शिरपूर व धुळे (जि. धुळे), शहादा, नंदुरबार या बाजार समित्यांनी अनामत रक्कम गोळा करणे, त्यांच्याकडे खरेदीचे परवाने आहेत की नाही, हे तपासणे बंधनकारक आहे. परंतु व्यापारी सर्रास कुठल्याही परवान्याशिवाय खरेदी करीत आहेत. राजस्थान, दिल्ली येथे शहादा, शिरपूर, बऱ्हाणपूर, बडवानी (मध्य प्रदेश) येथील व्यापारी पपई पाठवित आहेत. बाजार समित्यांना सेस मिळत नाही, म्हणून बाजार समित्या या खरेदीसंबंधी नियंत्रण आणायला तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून, पुढे फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.  सध्या धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा व शिरपुरात तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्‍यांत पपईची काढणी अधिक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावलमध्ये पपई बागांमध्ये काढणी  सुरू आहे. परंतु तीन व चार रुपये दर परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT