जळगाव ः कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मंत्रालयावर भारतीय मजदूर संघातर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा २१ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावरून सुरू होईल, अशी माहिती प्रदेश महामंत्री मोहन येणुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, सचिव विशाल मोहिते, सुरेशचंद्र सोनार, जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी आदी उपस्थित होते. मोहन येणुरे म्हणाले, की कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संघातर्फे ६ नोव्हेंबरपासून मजदूर चेतन यात्रा निघाली आहे.
ही यात्रा शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली असून, दोन विभागांत महाराष्ट्रातील २१ जिल्हे व १२५ तालुक्यांतून १७ नोव्हेंबरपर्यंत जाणार आहे. राज्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी योजनांची अंमलबजावणी सुरू करावी, किमान वेतन, बोनस, वेतनवाढ, कामावरून कमी करणे, या तक्रारींवर निर्णय होत नसून ओडिशा, हरियानाप्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत निर्णय, तसेच अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.