Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम सर्वांनाच द्या

सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिली जावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः सर्वच महसूल मंडळातील (Revenue Department) शेतकऱ्यांना पीकविम्याची (Crop Insurance) (२५ टक्के आगाऊ रक्कम दिली जावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector Office Jalgaon) केली आहे. अकोल्यात काही महसूल मंडळांत नुकसान लक्षात घेता २५ टक्के आगाऊ रकमेबाबत आदेश काढण्यात आले.

त्यानंतर कृषक समाजाने ही मागणी केली. निवेदनात म्हटले, की शासनाकडून चुकीचे सर्वे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. काही ठरावीक महसूल मंडळालाच पीकविम्याची आगाऊ २५ टक्के रक्कम देण्याची शिफारस केली आहे.

प्रशासनाने लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, शेषराव पाटील चिखलीकर, राजकुमार भट्टड, माणिकराव गावंडे, वासुदेव गावंडे, गोपाल पोहरे, विलास वरोकार, ज्ञानेश्‍वर आवारे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT