तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात. उन्हाळ्यामध्ये वाहतुकीदरम्यान शेळ्या, मेंढ्यांमध्ये उष्णतेचा ताण निर्माण होतो. याकरिता वाहनातील वायुवीजनाबाबत अतिरिक्त दक्षता घ्यावी. वाहनामध्ये हवेचा प्रवाह खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनामध्ये शेळ्यांची जास्त गर्दी होऊ देऊ नये. प्रवास सुरू केल्यानंतर प्रथम एक तासाने व नंतर प्रत्येक २ ते ३ तासांनी शेळ्यांची तपासणी करावी. वाहतुकीदरम्यान वाहन थांबवल्यास सावलीच्या ठिकाणी थांबवावे. उन्हामध्ये वाहन थांबवू नये. वाहतूक करतेवेळी तापमान व सापेक्ष आर्द्रता विचारात घेऊन वाहतूक करावी. वाहतुकीसाठी २५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अनुकूल असते. तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. यामध्ये शरीरातील ऊर्जेचा वापर, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करणे, जास्त खाणे, तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करणे अशी उष्माघातासारखी लक्षणे दिसतात. अशा वेळी शेळ्यांच्या डोक्यावर गार पाणी टाकल्यास शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. वाहतुकीनंतर घ्यावयाची दक्षता
संपर्कः डॉ. सचिन टेकाडे, ९३७०३४००५८ (सहायक संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.