कांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे पिकास मुळांच्या कक्षेमध्ये आवश्यकतेइतका पुरवठा करता येतो. मुळांजवळ वाफसा स्थिती असल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते. खरीप हंगामातील कांदा पिकावर हवामान बदल, अतिपाऊस, अधिक आर्द्रता, ढगाळ हवामानाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. खरीपासोबत रब्बी हंगामातील कांदा रोपवाटिकेच मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कांदा लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यातही सपाट वाफा आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्यावर जास्त भर असतो. सिंचनासाठी पाटपाणी पद्धतीचा अवलंब केला जातो. या पारंपरिक पद्धतीऐवजी शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर कांदा लागवड करावी. गादी वाफ्याची रुंदी ३ फूट आणि उंची १० ते १२ इंच इतकी असावी. गादी वाफे करताना रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीमध्ये चांगली मिसळून टाकावीत. यामुळे पिकाची वाढ संतुलित होण्यास मदत होते. पिकाच्या सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन या पैकी एका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे पाण्यामध्ये बचत होते. पिकास आवश्यक तितका व विभागून सिंचन करता येतो. विभागून विद्राव्य खते दिल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. खतांचा होणारा ऱ्हास टाळता येतो. कोणत्याही पिकांच्या चांगल्या वाढीसाठी मुळांजवळ वाफसा असणे आवश्यक असते. पिकाजवळी ल आर्द्रतेचे प्रमाणही योग्य राखता येते. अति आर्द्रतेमुळे येणारे करपासारखे रोग टाळता येतात. सूक्ष्मसिंचन पद्धतीचे फायदे
संपर्क ः बी.डी.जडे, ९४२२७७४९८१, (वरिष्ठ कृषी विद्या तज्ज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.