पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये वेळीच उपलब्ध न झाल्यास अंतर्गत शरीरक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे वाढीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पिकाच्या उत्तम वाढीसाठी लागणाऱ्या रासायनिक मूलद्रव्यांना आवश्यक अन्नद्रव्य असे म्हणतात. त्यांची वेळीच उपलब्धता न झाल्यास पिकांच्या अंतर्गत शरीरक्रिया व्यवस्थित चालत नाहीत. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे अन्नद्रव्यांच्या स्थलांतराप्रमाणे जुन्या किंवा नवीन पानावर दिसतात. आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकांची सामान्य वाढ होत नाही. पिकांची पाने पिवळी पडतात. पानावर तपकिरी, करडे डाग पडतात. पानाचा आकार लहान होतो, वाढ खुंटते, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी उत्पादनात घट येते. अन्नद्रव्ये पिकाला नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून १६ अन्नद्रव्ये लागतात. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांची एकूण गरज कमी जास्त असते. विद्राव्य खतांचा वेगवेगळ्या ग्रेडस् बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४, १३:००:४५, ००:००:५०, १३:४०:१३, १८:४६:०० ही सर्व खते पाण्यात संपूर्णपणे विरघळतात. त्यांचा वापर ठिबकद्वारे अथवा फवारणीद्वारे करता येतो. यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर करता येतो. ही सर्व खते पाण्यामध्ये गरजेप्रमाणे विरघळवून घ्यावीत.
तीव्रता
फायदे
संपर्क- विलास सातपुते, ९९२३५७५६८५ (सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान व रसायन शास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.