सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांतील द्राक्ष बागेत पुढील प्रमाणे समस्या येऊ शकतात. त्या जाणून घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात. मुळांचा विकास महत्त्वाचा द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर जेव्हा द्राक्ष घड बाहेर पडतो, तेव्हा त्या घडाच्या वाढीकरिता (प्रीब्लूम अवस्थेतील घड) लागणारे अन्नद्रव्य नवीन कोवळ्या फुटीतून घेतले जाते. मात्र या फुटीवर निघालेली पाने प्रकाश संश्लेषणाकरिता समर्थ नसल्यामुळे अन्नद्रव्याचा साठा फुटींमध्ये नसेल. म्हणजेच या अवस्थेतील घडाच्या विकासाकरिता त्वरित मिळणारे अन्नद्रव्य त्या छाटलेल्या काडीमधूनच घेतले जाईल. परंतु काडी परिपक्वतेच्या अवस्थेत (गेल्या हंगामात) पाऊस जास्त झाल्याने व तितकाच काळ ढगाळ वातावरणामुळे वेलीला आवश्यक तो सूर्यप्रकाश मिळाला नाही. म्हणून या अवस्थेत त्या काडीमध्येसुद्धा अन्नद्रव्य पुरेसे नसेल. या परिस्थितीवर मात करण्याकरिता या वेळी मुळांचा विकास महत्त्वाचा असेल. बागेमध्ये कुदळ किंवा खुरप्यांच्या साह्याने बोद मोकळे करून घ्यावेत किंवा बोदाच्या बाजूने ट्रॅक्टरच्या साह्याने चारी घेऊन या भागात नवीन मुळे तयार होतील, असे नियोजन करावे. बोद मोकळे करण्यातून जुनी मुळे पाच टक्क्यांपर्यंत तुटली असल्यास पंधरा ते वीस टक्के नवीन पांढरी मुळे तयार होण्याची शक्यता असते. पुढील काळामध्ये थंडी सुरू होण्याची शक्यता आहे. बागेतील तापमानसुद्धा तितकेच कमी होईल. त्यानंतर घडाचा विकास होणार नाही. या करिता मुळांवर आच्छादन (मल्चिंग) फायद्याचे राहील. यामुळे बोदामधील तापमान वाढण्यास मदत होईल. तेव्हा ज्या बागेत भारी जमीन आहे, अशा ठिकाणी पाण्याचा वापर कमी करता येईल. पाण्याचा वापर कमी केल्यास बोदातील मुळे कार्यक्षम राहण्यास मदत होईल. घडाची, तसेच मण्याची विरळणी या वर्षी बऱ्याच बागेत विविध समस्यांमुळे घड जिरण्याची व कुजेची समस्या जास्त प्रमाणात दिसून आली. त्यामुळे येत्या हंगामामध्ये घडांची संख्या आटोक्यात असेल किंवा काही ठिकाणी ती गरजेपेक्षा कमी असेल. ज्या बागेत घडांची संख्या जास्त आहे, अशा बागेमध्ये वेळीच विरळणी करून घेतल्यास पुढील काळात घडाच्या विकासासाठी फायदा होईल.
मणी गळ होण्याची समस्या बऱ्याचशा बागांमध्ये होत असलेल्या विविध बदलांमुळे वेलीवर जास्त ताण पडत असल्याचे दिसून येते. फुलोरा अवस्थेच्या पूर्वीची अवस्था म्हणजे दोडा अवस्था. या अवस्थेत वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे उदा. ढगाळ वातावरण, जास्त तापमान, वेलीला बसलेला पाण्याचा ताण, वेलीत वाढलेले जिब्रेलिन्सची मात्रा या बाबी दोडा अवस्थेतील गळीसाठी कारणीभूत असतात. या परिस्थितीतील द्राक्ष बागेत पुढील काळजी घ्यावी.
रोगांचा प्रादुर्भाव
संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.