सीताफळाची मुळे खोलवर न जाता वरच्या थरात राहतात, त्यामुळे चांगली वाढ मिळण्यासाठी योग्य प्रकारे खत व ओलिताचे व्यवस्थापन करावे.
योग्य मशागतीसह खतांचे नियोजन केल्यास सीताफळाचे चांगले उत्पादन मिळू शकते. फळे नवीन व जुन्या अशा दोन्ही फुटीवर येतात. म्हणून ही झाडे नत्राला चांगला प्रतिसाद देतात. नत्राची कमतरता असल्यास पानाच्या कडेला व टोकाला काळे डाग पडतात. पालाशची कमतरता असल्यास पानांच्या कडा जळतात. फळाचा आकार व प्रत सुधारण्यासाठी शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळखत, निंबोळी पेंड व रासायनिक खतांचे संतुलित नियोजन करावे.
ओलीत व्यवस्थापन : सीताफळाच्या झाडांना नियमित पाण्याची गरज नाही. निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चागले उत्पादन मिळते. परंतु संरक्षित ओलिताशिवाय झाडाला पहिली ३-४ वर्ष उन्हाळ्यात पाणी दिल्यास झाडांची वाढ चागली होते. त्याचप्रमाणे फळधारणेनंतर सप्टेबर ऑक्टोबर मध्ये १ -२ पाणी दिल्यास फळाची प्रत व आकार सुधारतो. बाग नांगरून घेतल्यास पावसाळ्यात बागेला जास्त पाणी उपलब्ध होते. उत्पादनावर आलेल्या बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे विश्रांतीच्या काळात झाडांना ३५-५५ दिवस पाणी देऊ नये. सर्वसाधारणपणे झाडांची ३५ ते ५० टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली, असे समजावे.
वळण व छाटणी ः
बहार व्यवस्थापन ः
पीक संरक्षण सीताफळावर सहसा मोठ्या प्रमाणात किडी व रोगांना बळी पडत नाही. त्यावर पिठ्या ढेकणाचा (मिली बग) प्रादुर्भाव होतो. ही कीड पाने, कोवळ्या फांद्या व फळातून रस शोषते. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जून-जुलै महिन्यात पिल्ले खोडावरून झाडावर चढतात. त्याच्या नियंत्रणासाठी १५-२० सेमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी किंवा लोखंडी पट्टीवर ग्रीस लावून खोडावर जमिनीलगत बांधून घ्यावी. किडीला झाडावर चढता येणार नाही. फळे कडक पडणे (स्टोन फ्रुट्स) : ही महत्त्वाची विकृती असून, फळांची वाढ पूर्ण न होता कडक होतात. रंग काळसर तपकिरी होऊन फळे झाडावरच राहतात. फळ वाढीच्या काळात अन्नरसासाठी स्पर्धा होऊन अन्नरस कमी पडल्याने विकृती येते. यासाठी झाडावर फळांची संख्या योग्य ठेवून अन्नद्रव्याचे संतुलित व्यवस्थापन करावे. फळे काळी पडणे : फळे ज्या वेळी कैरी एवढी होतात आणि या काळात जर हवेत आद्रता व सततचा पाऊस पडत असेल तेव्हा देठाजवळील खोल भागात पाणी साचून तेथील पेशी कुजू लागतात, बुरशी दिसते. याचे प्रमाण वाढत जाऊन फळाचा बराचसा भाग काळा पडतो. दुसरे कारण म्हणजे जर सीताफळाची बाग भारी काळ्या जमिनीत असेल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसेल तेव्हा आणि बागेत स्वच्छता नसल्यास खूप तणांचा प्रादुर्भाव झाल्यास हा प्रादुर्भाव वाढतो.
काढणी व उत्पादन : कलमांपासून लागवड केलेल्या झाडांना ३-४ वर्षांपासून बहार येतो तर बियांपासून तयार केलेल्या रोपांना ४-५ वर्षे बहार येण्यास लागतात. दरवर्षी प्रत्येक झाडापासून ११० ते १२० ग्रॅमची ६०-७० फळे मिळतात. सर्वसाधारणपणे ६-७ वर्ष वयाच्या झाडापासून १०० ते १५० फळे येतात. या पिकाचे आर्थिक आयुष्य हे १५ ते २० वर्षे राहते.
ः निवृत्ती पाटील, ०९९२१००८५७५ (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.