पेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. पारंपरिक शिफारशीपेक्षा या पद्धतीमध्ये फळझाडांची संख्या अधिक बसते. परिणामी, उत्पादनामध्ये वाढ मिळते. मात्र, या पद्धतीचा वापर करण्यासाठी झाडांची वेळोवेळी छाटणी करून आकार मर्यादीत ठेवावा. सघन लागवड (मिडो ऑर्चर्ड) म्हणजे काय? पारंपरिक शिफारशीप्रमाणे फळझाडातील अंतर हे झाडाची एकूण वाढ आणि त्याचा आकार लक्षात घेऊन केली जाते. मात्र, फळझाडांचा सुरवातीच्या काळामध्ये झाडांचा आकार तेवढा नसल्याने मध्ये मोकळी जागा राहते. या ऐवजी बुटक्या जातींच्या कलमांची एकरी अधिक प्रमाणात लागवड करण्यात येते. पुढे या झाडांच्या छाटणी व अन्य व्यवस्थापनातून आकार मर्यादित ठेवला जातो. या संपूर्ण तंत्रज्ञानाला सघन लागवड किंवा मिडो ऑर्चर्ड म्हणून ओळखले जाते.
सघन लागवडीचे फायदे :
अशी करावी सघन लागवड :
सघन फळबागेचे व्यवस्थापन :
पेरू फळबागेमध्ये फलधारणेसाठी उपाययोजना पेरू हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. पेरूमध्ये नैसर्गिकरीत्या वर्षभर फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. सामान्यतः तीन बहार हंगाम असतात.
मात्र, पेरूमध्ये पावसाळी हंगामापेक्षा हिवाळी हंगामाला प्राधान्य दिले जाते. कारण पावसाळ्यातील फलधारणेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे फळांची चवही कमी असल्याची तक्रार असते. हस्त बहाराने पावसाळा हंगाम असल्याने ४५ ते ६० दिवस आधी बागेला नैसर्गिकरीत्या ताण देणे शक्य असते.
हिवाळी हंगामातील फळधारणेसाठी : पेरूची फळधारणा व विकास हिवाळ्यामध्ये होण्यासाठी मृग बहार धरणे आवश्यक आहे. साधारणतः पावसाळ्यामध्ये फळधारणा न होता हिवाळ्यामध्ये फळधारणा करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांना बहार धरणे असे म्हणतात.
बहार नियंत्रण : साधारणपणे मे महिन्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४५ ते ६० दिवस ताण द्यावा. पाणी देण्याचे थांबवून बागेतील झाडांची पानगळ करावी. दरम्यान बाग कृत्रिमरीत्या सुप्तावस्थेमध्ये जाते. या वेळेमध्ये फळधारणेसाठी उपलब्ध असलेल्या फांद्यामध्ये पिष्टमय पदार्थांचा संचय होतो. नंतर फळबागेस जून महिन्यामध्ये शिफारशीनुसार खते व अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. त्यानंतर पाणी द्यावे. या प्रकारे ताण मिळालेल्या बागामध्ये फुटव्यांची संख्या वाढते. सर्व बागेमध्ये एकाच वेळी फुलांची निर्मिती होते. परिणामी, त्याचे नियोजन योग्य प्रकारे करता येते.
फुलोऱ्याचे नियंत्रण : पावसाळी वातावरणापेक्षा हिवाळ्यामध्ये फळधारणा होण्यासाठी फुलोऱ्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ते हातानेही करता येते. मात्र, मजुरांची कमतरता असल्यास रासायनिक पद्धतीचा अवलंब करावा.
रासायनिक पद्धत : पावसाळ्यामध्ये फुलधारणा टाळण्यासाठी मे महिन्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराने १५ टक्के युरीयाच्या (१५० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) दोन फवारण्या कराव्यात. त्याचप्रमाणे नॅप्थील अॅसेटिक अॅसीड (एन.ए.ए.) ५० ते १०० पीपीएम (५० ते १०० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणे एक फवारणी करावी.
संपर्क : डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२. (शास्त्रज्ञ उद्यानविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खेडब्रह्मा, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.