भाजीपाला पिकास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जमिनीचा मगदूर, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, जमिनीची रचना व घटक, वातावरणातील तापमान आणि भाजीपाला पिकाचे आनुवंशिक गुणधर्म या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. अतिपाण्यामुळे भाजीपाल्यामध्ये मुळकूज, रोपे कोलमडणे, मर, कंदसड, फळसड यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
मुळांवर परिणाम : भाजीपाला पिकांची मुळे ३० ते ६० सें.मी. खोलीपर्यंत वाढत असतात. जमिनीत या खोलीपर्यंत मुळांजवळ पाणी साचून राहिल्यास मुळांची श्वसनाची क्रिया मंदावते. परिणामी अन्नद्रव्य शोषण व जमिनीत आधार मिळविणे या दोन्ही कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
पुनरुत्पादन अवस्था : फुलोरा किंवा फळवाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकात अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा आवश्यक असताे. अतिरिक्त पाण्यामुळे मुळांची कार्यक्षमता घटून अन्नद्रव्यांचा पुरवठा अपुरा होतो. परिणामी पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होऊन उत्पादनात व दर्जात घट होते. उदा. टोमॅटो किंवा ढोबळी मिरची पिकात जी चकाकी आवश्यक असते ती मिळत नाही. फळसडसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून दर मिळत नाही.
अतिपाण्याचा परिणाम :
उपाययोजना :
संपर्क : डॉ. एस. एस. घावडे, ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.