Ahilyanagar News: शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने कांदा पिकवून बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र प्रति क्विंटल केवळ १०० रुपये दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याला ६.२१ क्विंटल कांदा विक्रीतून केवळ ६२१ रुपये मिळाले असून वाहतुकीसह अन्य असा ६०० रुपये खर्च आल्यामुळे शेतकऱ्याला रिकाम्या हाती घरी परतावे लागले आहे. .अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील बाजार समितीमधील कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे हे भीषण वास्तव समोर आले आहे..Farmer Issue: कर्जाशिवाय अनुदान नाही अन् कर्जही मिळत नाही.संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील सचिन थेटे यांनी यंदा दीड एकरावर लाल कांद्याचे उत्पादन घेतले. ४१ गोण्या कांदा निघाला. आधी २९ गोण्या विकल्या, त्यातून चौदा हजार रुपये आले, तर राहिलेल्या १२ गोण्या संगमनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी विकल्या. अवघा एक रुपया प्रति किलो दर मिळाला..Onion Price: अहिल्यानगरला गावरानसह लाल कांद्याच्या दरात सुधारणा.त्यात वाहतूक, हमाली व अन्य खर्च सहाशे रुपये झाला. आलेले पैसे वजा करून खरेदीदार व्यापाऱ्याने शून्य रुपयाची कांदा पावती सचिन यांच्या हाती टेकवली. असाच अनुभव संगमनेरमधील अनेक शेतकऱ्यांचा आहे. अशा पावत्या अनेक शेतकऱ्यांकडे आहेत..सरकार कोट्यवधींचा खर्च करत असताना शेतकऱ्यांना तारणार की मारणार, असा प्रश्न पडल्याव्यतिरिक्त शेतकरी काहीच करू शकत नाही.सचिन थेटे, निमगाव जाळी, ता.संगमनेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.