Yavatmal News : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा हंगाम सरस ठरत थोडाफार नफा होत त्यातून देणीदारांची देणी चुकती करता येईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर संततधार पावसाने पाणी पडले आहे. .पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी चिबडत शेत जलमय झाल्याने पिकांना अक्षरशः कोंब फुटले आहेत. दुसरीकडे प्रशासकीयस्तरावर या वेदनांची कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. .Soybean Crop Damage: तीस टक्के सोयाबीनला पावसाचा जबर फटका.आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख. मात्र याच जिल्ह्याला गेल्या काही महिन्यांपासून पूर्णवेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीही शासनाला देता आला नाही. त्यावरूनच शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप होत असून त्याला दुजोराही मिळत आहे. अशातच गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू असून दिग्रस तालुक्यासह अनेक भागांतील शिवार जलमय झाले आहे. .Hingoli Crop Damage: ऑगस्टमध्ये दोन लाख हेक्टरवर नुकसान.त्याच्या परिणामी कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत पीक जळाल्याचेही समोर आले आहे. परंतु प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या या समस्यांची दखलच घेतली जात नसल्याचे वास्तव असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. .नुकसानीनंतर सर्व्हेक्षण आणि पंचनाम्यापुरतेच प्रशासन असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दिग्रस तालुक्यात जलमय शिवारातील सोयाबीनला आता कोंब फुटले आहेत..दिग्रस तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, ऊस अशा पिकांखालील ३९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.- शांतीराम धानुडे, तालुका कृषी अधिकारी, दिग्रस, यवतमाळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.