Kolhapur News: सुधारित संचमान्यतेमुळे हजारो शिक्षकपदे रिक्त होणार असून, त्यामुळे खेड्यापाड्यातील हजारो शाळा बंद पडणार आहेत. या विरोधात जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा शाळा बचाव आंदोलनाचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी दिला. शाळा बचाव समितीकडून याबाबतचे पत्रक प्रसिद्धी दिले आहे. .पत्रकात म्हटले आहे, तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने २० पटाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आजरा तालुक्यातील शिक्षक, पालकांनी व शाळा व्यवस्थापन समित्यांनी एकत्र येत तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आजरा ते सावंतवाडी लाँग मार्च काढला. .Eklavya School Admission: एकलव्य इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश सुरू.याची दखल घेत त्यांनी निर्णय तात्पुरता स्थगित केला; पण पुन्हा १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय करून आता ती संच मान्यता अंतिम करण्याचा विचार सरकार करत आहे. यातून हजारो शाळा बंद पडून अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत..Agriculture In Schools: शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश; राज्य सरकारचे निर्देश .याविरोधात आंदोलनाचा निर्णय शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने घेतला आहे. पत्रकावर कॉ. संपत देसाई, कृष्णा भारती, सम्राट मोरे, संजय तरडेकर, युवराज पवार, शिवाजी गुरव, दशरथ घुरे आदींच्या सह्या आहेत..लवकरच जिल्हाव्यापी बैठक२० फेब्रुवारीला हरकती नोंदणीबद्दल राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. २५ फेब्रुवारीअखेर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड्यापाड्यांतील शाळा, हायस्कूल बंद पडणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.