Nashik News: येवला तालुक्यातील खैरगव्हाण शिवारात रानडुकरांनी धुडगूस घातल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रब्बी हंगामातील मका पीक सध्या कणसावर आले असताना रात्रीच्या वेळी शेतात शिरून पिकाची मोठी नासधूस केली आहे..अगोदरच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात आता रब्बी हंगामात पिके जोमदार असताना रानडुकरांच्या टोळीने अडचणी वाढविल्या आहेत. टोळीने रात्रीच्या वेळी शेतात शिरून कणसे फस्त करत आहेत. यासह मक्याची ताटे मुळापासून उपटली जात असून, पूर्णतः भुईसपाट झाले आहे..Wildlife Attack: वन्यप्राण्यांचे हल्ले तातडीने रोखा: कौठकर.काढणीच्या तोंडावर आलेले पीक अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी साहेबराव सैद यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला हरणांचा प्रादुर्भाव असल्याचा संशय होता. मात्र शनिवार (ता.२४) रोजी रानडुकरांची टोळी नजरेस पडली..Wildlife Crop Damage: वन्यप्राण्यांकडून केळी, भाजीपाला पिकांची हानी.त्यानंतर फटाके फोडून उपद्रव थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र रानडुकरे पळून जात त्यांनी दुसऱ्या शिवारात मोर्चा वळविला. रानडुकरांची संख्या मोठी असल्याने समजते..भरपाईची मागणीवनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.