Palghar News: पालघर जिल्ह्यात रब्बी हंगामात मिरची, ढोबळी मिरची, शिमला मिरचीसह कडधान्यवर्गीय पिकांमध्ये वाल, चवळी, हरभरा, भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, वांगी, वेलवर्गीय पिकांमध्ये दुधी भोपळा, शिराळे, दोडका, तसेच कोबीवर्गीय पिके, फुलशेतीसह तेलवर्गीय पिकांची लागवड केली जाते. .मागील काही दिवसांपासून अवकाळीचे संकट सुरू असल्याने रब्बीचा हंगाम लांबला आहे. अवकाळीने विश्रांती घेतल्यानंतर आता जिल्ह्यातील शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीकडे वळला असून, पूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. .Rabi Season: रब्बी हंगामात ज्वारीचा वाढता पेरा.पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत. सद्य:स्थितीत १० ते २० टक्क्यांच्या आसपास मिरचीची लागवड झाली आहे, तर काही भागांमध्ये मिरची लागवडीच्या पूर्वतयारीला शेतकरीवर्ग लागला आहे..Rabi Season: हरभऱ्याची एक लाख १० हजार हेक्टरवर पेरणी.अवकाळीमुळे रब्बी हंगामास उशिरा होत आहे. थंडीला सुरुवात होण्याअगोदर भाजीपाला, तसेच कडधान्य पिकांची लागवड करून घ्यावी. - डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर.सुरुवातीच्या काळात नांगरणी केल्यावर अवकाळीची बरसात झाल्याने दुबार नांगरणीची वेळ आली आहे. पावसामुळे मिरची लागवड क्षेत्रातही ३०ते ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.- मिलिंद मर्दे, मिरची उत्पादक शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.