Madhmashi Palan in Agriculture: ब्राझीलमधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात एक नवीन प्रयोग केला. सोयाबीनच्या शेतात मधमाशा सोडल्याने उत्पादनात २० टक्के वाढ पहायला मिळाली. सोयाबीन हे स्वपरागसिंचन करणारे पीक आहे. परागसिंचनासाठी त्याला बाह्य घटकांची आवश्यकता नसते. तरीसुद्धा मधमाश्यांमुळे सोयाबीन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. यामागे परागीसिंचनातील वाढ, गुणवत्तापूर्ण दाणे, पुरक व्यवसाय ही कारणे असू शकतात..परागीभवनमधमाशा केवळ रस गोळा न करता त्या पिकांमध्ये परागसिंचनाचे महत्त्वाचे काम घडवून आणतात. पीक फुलोरा अवस्थेत असताना त्यामध्ये परागीभवन होते. परागीभवन म्हणजे नर फुलांमधील परागकण मादी फुलामध्ये जाण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया घडण्यासाठी बाह्य घटकांची गरज पडते. जसे हवा, पाणी, कीटक यांच्या माध्यमातून परागीभवन वाढते. .Beekeeping Business: मधुमक्षिका पालन; कमी खर्चात जास्त नफा देणारा शेतीपूरक व्यवसाय!.परागीभवनामध्ये दोन प्रकार असतात. काही पिकांमध्ये स्वपरागीभवन होते कारण त्या पिकाचे नर आणि मादी हे दोघे एकाच फुलात असतात. तर काही पिकांमध्ये परपरागीभवन होते. म्हणजे नर फुल आणि मादी फुल वेगवेगळे असते आणि त्यातील परागीभवन हे कीटकांच्या मार्फत होते..उत्पादन वाढीची कारणेमधमाश्यांमुळे परागीभवन फार मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे फळधारणा वाढते. मोठ्या प्रमाणात फुलांचे रुपांतर शेंगामध्ये होते. परागसिंचन अधिक झाल्यामुळं शेंगा भरघोस भरल्या. त्यामुळे शेंगेमधील दाण्यांची संख्या वाढली. सामान्यपणे स्वपरागसिंचनात प्रत्येक फुलाचे परागसिंचन होईलच असे नसते. .Honeybee Crisis: रासायनिक खतांमुळे मधमाश्यांच्या पोळ्यांवर संकट.परंतु जेव्हा मधमाश्यांच्या मदतीने फुलांचे परागसिंचन होते तेव्हा फुलांमध्ये जवळपास १०० टक्के परागीभवन होते. त्यामुळे शेंगांची आणि दाण्यांची संख्या वाढते. साधारणत: उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ मिळते, तरी पिकानुसार फरक पडतो. याशिवाय हवामान बदल होत असला तरी परागसिंचन सुधारल्यामुळं उत्पादन स्थिर राहते..गुणवत्तेत वाढउत्तम परागीभवन झाल्यावर केवळ उत्पादन वाढत नाही तर दाण्यांची गुणवत्ताही चांगली भरते. कारण चांगल्या प्रकारे परागसिंचन झाल्यावर दाण्यांमध्ये अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात असतात आणि बियांचे वजन वाढते. त्यामुळे बिया आणि फळे दर्जेदार आणि मजबूत बनतात..पुरक व्यवसायमधुमक्षिका पालनामुळे पिकांमध्ये उत्पादन तर वाढतेच. मधुमक्षिका पालन हा शेतीपुरक व्यवसाय म्हणून करता येतो. कारण मधमाशा या शेतामध्ये मध तयार करतात, त्यांच्या पोळ्यापासून मेण (वॅक्स), परागकण(पोलन), रॉयल जेली मिळते. त्यामुळे दुहेरी उत्पादन सुरु होते. तसेच हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात होत असल्याने व्यवसाय फायदेशीर ठरतो.जर मधमाशा संपल्या तर अन्ननिर्मितीमध्ये अडथळे येतील आणि जग संपेल असं भाकित शास्त्रज्ञांनी फार पू्र्वी केलेले आहे. यावरुन मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्त्व लक्षात येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.