लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय...वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय?पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा.आणि सप्टेंबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा.शाळेच्या सुरुवातीला पोराटोरांसंगे दंगा करायचा..ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावरकौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा.आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा.काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा, आभाळमाया करायचा.सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा.वसिष्ठीला वंदन करून तापीच्या पायावर लीन व्हायचा.त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा...वाटेतल्या बांधांबांधांवर वडिलकीच्या मायेने हात फिरवायचा.एखाद्या चंद्रमौळी झोपडीत वाकून बघताना गहिवरून यायचा..Monsoon Rain: मराठवाड्याला पाऊस पुन्हा दणका देण्याचा अंदाज.ओल्या बाळंतीणीच्या अंधारल्या खोलीत डोकावून पाहताना बाळाच्या मखमली पायाला गुदगुल्या करायचा.गावागावातल्या मंदिरांची शिखरे अन मस्जिदींचे मिनार स्वच्छ धुवून काढायचा.वेशीवरच्या जीर्ण पिंपळाला आलिंगन द्यायचा.पारावरच्या वटवृक्षाच्या पारंब्यांशी झोंबायचा.गावकुसातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या डोईवरल्या चांदीला स्पर्श करूनअंगणातल्या तुलसी वृंदावनाला वंदन करायचा.पांदीतल्या आंब्यापाशी आठवणींची सय कुशीत घेऊन झोपायचा.गावांच्या शिवेपाशी थरथरून जायचा..ओढ्यांच्या कडेने वाहतानाअनंतात लीन झालेल्यांचे अस्तित्व शोधत फिरायचा.कडेवर नातवंडे घेऊन चाललेल्या वृद्धांच्या भाळाचे चुंबन घ्यायचा.मातीत कोसळून अंकुराच्या देठातून उगवून यायचा.म्लान झालेल्या गवतफुलांना लकाकी द्यायचा.पूर्वीचा पाऊस बोलायचा म्हणे!माणसंच नव्हे तर झाडंझुडपं, पशूपक्षी देखील त्याच्याशी संवाद साधायचे.पहिल्या पावसाच्या वेळी त्याचे पूजन व्हायचे..Maharashtra Monsoon Rain: राज्यात जोरदार पावसाची शक्यता; मराठवाड्याला पाऊस पुन्हा दणका देण्याचा अंदाज.गावतळे तुडूंब भरल्यावर ओटी भरायचे.पाऊसही मग जाम खूष व्हायचा.आपल्या लेकरांवर तालासुरात कोसळायचा.श्रावणात माहेरी आलेल्या माहेरवाशिणींच्या डोळ्यातून वाहायचा.तिच्या संगे उंच झुल्यावर विहरताना रडता रडता हसायचा.भाद्रपदात परतीच्या पावसाची पावले जड व्हायची.गोठ्याचं दावं तोडून गेलेल्या वासरागत वागायचा.लहर आली तर परत यायचा नाहीतर माळांवरच्या झाडांत दडून बसायचा..निरोप घेताना तो ओक्साबोक्शी रडायचा!घरादाराला आशीर्वाद देऊन जायचा.सूरपारंब्या खेळताना फांद्यांवर केलेल्या खुणांपाशी रेंगाळायचा.शहरातल्या डांबरी सडकांवर इंद्रधनुष्य रेखाटायचा.बागेत बसलेल्या जोडप्यासंगे ओला कंच होऊन जायचा.गल्लीच्या कोपऱ्यावरल्या टपरीवरचहाच्या वाफाळत्या चॉकलेटी द्रावणावर जीव लावायचा.भिजून घरी गेलेल्या चाकरमान्यासंगे घरात मुक्त शिरायचा.आणि थकलेल्या आईच्या हातची गरमागरम भजी खाऊन पुन्हा बाहेर पडायचा,.Monsoon Rain: मॉन्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार?.नव्याने कोसळण्यासाठी!प्रेमिकांच्या पहिल्या आलिंगनाशी एकजीव होताना पुरता रोमॅण्टिक व्हायचा,तिच्या गालावरून ओघळत यायचाआणि त्याच्या ओठांवर स्थिरावायचा.चेन पडलेल्या सायकलमागे फरफटत जायचा.हायवेवरून सुसाट जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांशी स्पर्धा करायचा.कोसळताना तो काळी, तांबडी माती असा भेद करत नसे.बोरी बाभळींनाही माया लावायचाआणि बकुळ प्राजक्तांवरही प्रेम करायचा..पूर्वी त्याचे काही शिरस्ते होते.त्याचा एक मौसम होता.त्याची एक पद्धत होती.त्याचं एक वेळापत्रक होतं.पूर्वी माणसांचंही वेळापत्रक होतं म्हणे…आता लोकांपाशी वेळच उरला नाहीय.सगळ्याची घाई आहे.सावकाश निगुतीचं काही उरलंच नाही.खाणं-पिणं असो वा असो झोपणं..Monsoon Cotton Crop Management : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्यावयाची काळजी .सगळं घाईतच असतं.मनमुराद गप्पादेखील होत नाहीत.फुरसतीनं भटकणं होत नाही.व्यक्त होण्याचीही घाई असते.नावालाच बोलायचे असते, मन मात्र जागेवर नसते.रस्त्यांनी घाई, जायची घाई, यायची घाई.ब्रेकअपची सुद्धा असते घाई.नुसती घाई!पूर्वी घराबाहेर पडताना उंबऱ्यापाशी हलणारा हात असायचा..सोज्वळ हसायची अंगणातली जाई आणि प्रेमळ आई.आता कुठले छंद उरले नाहीत की कुठल्या आवडी हौसेने राहिल्या नाहीत.मने जुळायच्या आधीच तुटायची आस असते.मागे सिनेमे महिनोन्महिने थियेटरवर असत.आता चारच दिवसांत त्यातली मजा संपलेली असते.पूर्वी एखादं गाणं वर्षभर ऐकलं जायचं.आता दिवसागणिक हीट गाणं बदलतं.पूर्वी रोज थोडे थोडे पैसे साठवत असत.आता बसतात जॅकपॉटसाठी तिष्ठत..Monsoon Rain: शुक्रवारपासून पाऊस पुन्हा तडाखा देण्याचा अंदाज.आताशा तासाला बिग ब्रेकिंगची बातमी बदलते.त्यातलं मूल्यही मिनिटांत संपून गेलेलं असतं.सकाळची गोष्ट संध्याकाळी राहत नाही.रात्रीच्या आणाभाका सकाळी स्मरत नाहीत.महिन्याचं काम एका दिवसात करायचं असतं.वर्षाचं पीक एका महिन्यात काढायचं असतं.सालभराची कमाई तासात हवी असते.इतकेच काय कुठली शहाणिवही आता नकोशी असते,.सणवाराला माहेरी यायचीही ओढ नसते.मौतीला सुद्धा आता माणसं येत नाहीत.आरआयपीचा मेसेज पाठवतात.जिवलगांपाशी बसायला माणसांना वेळ नसतो.मायबापांना पोराबाळासाठी नि पोरांना आईसाठी टाइम नसतो.आणि पतीच्या छातीवर मस्तक टेकवायला पत्नीला उसंत नसते.मैदानांवर खेळासाठी मुलांना सवड नाही..Monsoon Rain Maharashtra: शुक्रवारपासून पुन्हा पाऊस वाढणार; पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता.पुस्तके ही तिष्ठत असतात वाचणाऱ्या हातांच्या प्रतिक्षेत.सालं ते प्रेमसुद्धा इन्स्टंट असतं.सकाळी दृष्टादृष्ट झाल्यावर दुपारीच आडोसा शोधत फिरतं.श्रमलेल्या पायांवर मस्तक टेकायची ओढ नसते कुणाला.दमलेल्या हातांना धन्यवाद द्यायला आवडत नाही कुणाला.विचारलाच जाब कुणी तर सरळ सरळ उत्तरतात - वेळच नाही हो कुणाकडे.हल्ली टाइम भेटत नाही दुनियेला!पावसाचंही तसंच झालंय..आताशा वेळ नसतो त्याच्याकडे.वर्षाची सरासरी एका दिवसात गाठतो.कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो.अचानक येतो मग.सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा,पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन.विचारलं तर म्हणतो आता मन रमत नाही गं आई..पावसाचंही तसंच झालंय. त्याचं आता मन रमत नाही.आता तो बसरतो फक्त बॅकलॉग भरण्यासाठी.त्याच्याकडे वेळ उरला नाही.तो कुणाची विचारपूस करत नाही कीकुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही.दोस्तहो पाऊस बदललेला नाहीआणि चुकलेलाही नाही.तो तर आपल्यासारखंच वागतोय.मग त्याला दोष देऊन कसं चालेल?तरीही एका गोष्टीने व्याकूळ व्हायला होतं.अपराध, चुका करतात वेगळेच लोक.आणि त्याचे वेदनासूक्त गावे लागतेभुकेजलेल्या श्रमलेल्या अर्धपोटी निरपराधांना.हा कसला न्याय म्हणायचा?- समीर गायकवाड ८३८०९७३९७७, ९७६६८३३२८३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.