Soybean Germination Complaints: पश्चिम विदर्भात पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचे नवे संकट उभे राहिले आहे. हजारो एकरांवरील पेरणीनंतर सोयाबीनची उगवण न झाल्याच्या तक्रारी वाढत असून, बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परिणामी, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे..बियाणे व्यापारक्षेत्रातील चर्चेनुसार, काही कंपन्यांनी खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करून त्यावर प्रक्रिया करत ते बियाणे म्हणून विक्री केल्याचा आरोप आहे. मात्र, या बियाण्यांची गुणवत्ता, साठवणूक आणि उगवण क्षमता पुरेशी तपासल्याशिवाय विक्री करण्यात आल्याचा दावा केला जात आहे..Soybean Germination Failure: शुद्ध बीजापोटी....विशेषतः ‘ट्रुथफुल’ बियाण्याच्या नावाखाली विक्री झालेल्या बियाण्यांबाबत उगवण कमी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सध्या अनेक भागांत पाऊस थांबल्याने उगवणीबाबतच्या तक्रारी आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे..गेल्या काही वर्षांत पांढऱ्या फुलाच्या सोयाबीन वाणांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. या वाणांच्या नावाखाली काही कंपन्यांनी बियाण्यांचे दरही वाढवले. मात्र, याच बियाण्यांबाबत उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कृषी विभाग आणि तज्ज्ञांच्या पाहणीतही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याचे सांगितले जात आहे..तक्रारींची दखल घेत कृषी तज्ज्ञांची पथके शेतपातळीवर पाहणी करीत आहेत. एका कृषी तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी आणि एकाच शेतात पेरणी केलेल्या तुरीची उगवण चांगली झाली; मात्र सोयाबीनची उगवण अत्यल्प असल्याचे दिसून आले. काही शेतांमध्ये तर केवळ २ ते ३ टक्केच उगवण झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे..Poor Quality Soybean Seeds: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे विदर्भातील शेतकरी संकटात.नियमानुसार ‘ट्रुथफुल’ बियाण्याची उगवण क्षमता किमान ७० टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र, खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीनची गुणवत्ता, साठवणूक आणि उगवण क्षमता योग्य प्रकारे तपासली गेली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे बियाणे कंपन्यांच्या कार्यपद्धतीबरोबरच गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..सत्वर दिलाशाची मागणीया प्रकाराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पेरणीवरील खर्च वाया जाण्याबरोबरच दुबार पेरणीसाठी बियाणे, खते आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. कमी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दोषी बियाण्यांची चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.