Palghar News : हवामानामध्ये सातत्यपूर्ण होत असलेल्या बदलाचा फटका मासेमारीवर बसत आहे. समुद्रातील वादळे, वारा, पाऊस, खवळलेला समुद्र अशा कारणांमुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे अनेक दिवस बोटी किनाऱ्यावर नांगरल्या आहेत. हवामानाच्या अस्मानी संकटामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजासह मच्छीमार हवालदिल झाले आहेत. .गेल्या दोन महिन्यांपासून हवामान बदलांमुळे मासेमारी बोटी अनेक वेळा बंद ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर ओढवली आहे. त्यामुळे ऐन हंगामात मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. .Illegal Fishing : अवैध मासेमारीविरोधात ड्रोन प्रभावी.हंगामात चांगले मासे मिळत असल्यामुळे मनुष्यबळासह बोटीवरील साहित्य, बर्फ, डिझेल अशा गोष्टी खरेदी करून मासेमारीला सुरुवात करणार तोच हवामान विभागाकडून खराब हवामान असल्याचे सांगून मासेमारीला न जाण्याच्या सूचना आल्याने प्रमुख बंदरात बोटी नांगरल्या आहेत..Fish Farmers Relief: राज्यात मत्स्य व्यावसायिकांना अतिवृष्टीच्या मदतीचे दर निश्चित.खर्च परवडेनाहवामान खराब असल्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत मासेमारीला जाऊ नये, असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. त्यामुळे या दिवसांचा माणसाचा खर्च आणि त्या आधी बंद ठेवलेल्या दिवसांच्या माणसांचा खर्च झेपवेनासा होऊन बसला आहे..घटत्या मत्स्य उत्पादनामुळे मच्छीमारांचे कंबरडे आधी मोडले आहे. खराब हवामानामुळे अनेक दिवस मासेमारी बंद ठेवली गेली. भरपाईसाठी सरकारने पुढाकार घ्यावा.- ज्योती मेहेर, अध्यक्ष, राज्य मच्छीमार सहकारी संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.