Nashik News: कुंभमेळा बाह्यवळण मार्गाला मोबदल्याशिवाय जमिनी देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान भरपाई न देता सुरु केलेल्या कामा विरोधात शेतकऱ्यांनी चिंचोली (ता. सिन्नर) येथे बुधवार (ता. २४) पासून साखळी उपोषण सुरु असून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू होते..चिंचोली फाटा ते पांढुर्ली या बाह्यवळण राज्यमार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. पांढुर्ली, विंचूरदळवी येथे बाधितांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तथापि वडगाव-पिंगळा व चिंचोली या गावांतील बाधितांना भरपाई न देताच काम केले जाणार असल्याने त्या विरोधात शेतकरी, ग्रामस्थ एकवटले आहेत. दोन्ही गावांतून शेतकऱ्यांना विरोध आहे. या मुद्द्यावर भास्कर उगले, कचरू गंधास, भाऊसाहेब हरळे, दत्तात्रय मुठाळ, अंबादास झाडे, सखाहरी गोडसे, योगेश हरळे, संपत विंचू, माधव झाडे, धोंडू झाडे, अशोक जगताप, ज्ञानेश्वर सानप यांच्यासह शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत..Land Acquisition Compensation : शेतकऱ्यांना मिळेना हक्काचा मोबदला.राज्यमार्गाला विरोध नसून भरपाई न देता काम सुरु होत असल्याने त्यास विरोध असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. पांढुलों आणि विंचूर दळवी येथील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. तसेच शिंदे ते लाखलगाव दरम्यान शेतकऱ्यांच्या मोबदला देऊन खरेदी केल्या जात आहेत. मात्र चिंचोली आणि वडगाव पिंगळा येथील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्याचे काम चालू केले आहे. एका गावाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, यामुळे येथे विरोध निर्माण झाला आहे..Land Acquisition Compensation : शेतकऱ्यांना मिळेना हक्काचा मोबदला.अनेक वर्षापासून राहत असलेली घरे, विहिरी, गोठे, पॉलिहाऊस, कूपनलिका, दुकाने, झाडे आदींचे नुकसान होणार आहे. अन्य गावांना दिलेला न्याय चिंचोली व वडगावपिंगळा या गावांना देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, रीतसर खरेदी करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, सरकारने वेळीच तोडगा काढावा,शेतकऱ्यांच्या मागण्या विचारात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे..शेतकरी मागण्यांवर ठामभूसंपादन व शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागे घ्यावे याबाबत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावर जमिनीचे भूसंपादन कसे होणार त्यास मोबदला कसा मिळणार, याबाबत जोपर्यंत स्पष्ट लेखी मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण मागे घेणार नाही याबाबत शेतकरी ठाम होते. खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील भेटीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत मागण्या सरकारसमोर मांडू, असे आश्वासन दिले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.