Ahilyanagar News: अतिवृष्टी आणि सतत पाऊस सुरू राहिलेल्या भागात शेतांत पाणी साचून राहिल्याने शेतजमिनी चिभडल्या आहेत. त्यामुळे तुरीचे पीक पिवळे पडू लागले आहे. काही भागांत पीक करपत आहे. सध्या पीक फुले लागण्याच्या स्थितीत असून, राज्यात दहा जिल्ह्यांतील क्षेत्रावरील पीक अडचणीत आले आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे..महाराष्ट्रामध्ये तुरीचे क्षेत्र अंदाजे १२ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले जाते. प्रामुख्याने अहिल्यानगर, सांगली, सातारा, पुणे, विदर्भ, सोलापूर व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरीची लागवड होते. यंदाही सरासरीएवढी तुरीची पेरणी झाली आहे. मात्र यंदा सुरुवातीपासूनच तुरीचे पीक अडचणीत आहे. सध्या तुरीचे पीक फुलांच्या आवस्थेत आहे. यंदा तुरीच्या पेरणीनंतर पावसाचा काही काळ खंड पडला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी, पुराने तुरीचे मोठे नुकसान केले. अनेक मंडलांत सलग चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली..Crop Damage: पावसाने ३६ हेक्टरवर पिके बाधित.सततचा पाऊस असल्याने व जमिनीची पाणी धारण क्षमता संपल्याने शेतात पाणी साचून राहिले आहे. आता पाऊस थांबून पंधरा दिवसांचा कालावधी झाला तरी शेतात पाणी कायम आहे. त्यामुळे जमिनी चिभडल्या आहेत. शेतात गाळ तयार झालेला आहे. त्याचा परिणाम तुरीच्या झाडावर होत आहे. पंधरा ते वीस दिवस सतत पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्या सडल्या असून बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे..Crop Loss Compensation: निफाडला बाधित शेतकऱ्यांना ४७ कोटी : आमदार बनकर.पाण्यातील तुरीच्या झाडांना फुले लागली नाहीत. जेथे पाणी निचरा झाला असला तरी अधिक काळ ओलावा असल्याने त्या शेतातही तुरीच्या झाडाला फुले लागण्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. अतिवृष्टी आणि सतत पाऊस सुरू राहिलेल्या भागांत जमिनीत सतत पाणी साचून राहिल्याने जमिनी चिभडल्या आहेत अशा भागांतील ४० टक्के तुरीचे पीक वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही पस्तीस हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्रावरील तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी यंदा आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..तुरीच्या दरात घट झाल्याचा यंदा पेरणीवर परिणाम झाला. त्यात यंदा सततचा पाऊस, अतिवृष्टिमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीचा मोठा परिणाम झाला आहे. जमिनी चिभडल्याने व मुळ्या सडल्याने झाडे जागेवर करपली आहे. अजून अनेक भागांत वाफसा नाही. जमीन वाफशावर आल्यावर हे नुकसानीचे परिणाम अधिक दिसेल.प्रशांत देशमुख, तूर उत्पादक शेतकरी, मांडवगण, ता. श्रीगोंदा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.