Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये यंदा पाणीसाठा समाधानकारक असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत उपलब्ध साठ्यात वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या बुधवारच्या (ता. चार) अहवालानुसार, जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ५७.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे..जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील एकमेव मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पाची स्थिती आशादायक आहे. या प्रकल्पात सध्या ६९.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या प्रकल्पात केवळ ४५.५९ टक्के साठा होता. त्या तुलनेत यंदा २४ टक्के अधिक पाणीसाठा आहे..Water Management: नियोजन न केल्यास २०३१ नंतर राज्यात भीषण पाणीटंचाई.मध्यम प्रकल्पांची स्थितीजिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६१.६९ टक्के उपयुक्त साठा आहे. यामध्ये काही प्रमुख प्रकल्पांत म्हणजेच तेरणा (लोहारा) प्रकल्पात ६६.९३ टक्के, कुरनूर (तुळजापूर) प्रकल्पात ६६.१७ टक्के, खंडाळा (तुळजापूर) प्रकल्पात ७७.५० टक्के, तावरजा (धाराशिव) प्रकल्पात ५८.८५ टक्के, तर काडा (भूम) प्रकल्पात ७४.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, चांदणी (परंडा) प्रकल्पाचा भराव खचल्याने तिथे दुरुस्तीचे काम सुरू असून सध्या तो प्रकल्प ५७.९२ टक्के भरलेला आहे..लघु प्रकल्पांची सद्यःस्थितीजिल्ह्यातील २०८ लघु प्रकल्पांमध्ये एकूण ५२.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धाराशिव तालुक्यातील लघु प्रकल्पांत ५१.४४ टक्के, तर कळंब तालुक्यातील प्रकल्पांत ५१.४५ टक्के साठा आहे. तुळजापूर आणि परंडा तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक साठा उपलब्ध असल्याने उन्हाळ्याची चिंता काही अंशी कमी झाली आहे..Water Supply Relief: खानदेशात टंचाईची तीव्रता कमी .मागील वर्षापेक्षा १५ टक्के जादा साठाजिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा आजच्या घडीला ४१८.६२८ द.ल.घ.मी. इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ३१२.६६५ द.ल.घ.मी. (४२.९० टक्के) इतका होता. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे १५ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे..आगामी तीन महिन्यांचे नियोजन आवश्यकजिल्ह्यात सध्या सरासरी ५७.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असला, तरी वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच उन्हाचा कडाका जाणवू लागल्याने पाणीसाठ्यात वेगाने घट होऊ शकते. पुढील तीन महिने हे जिल्ह्यासाठी अत्यंत कळीचे आहेत. सध्या सीना कोळेगावसारख्या मोठ्या प्रकल्पात ६९ टक्के साठा असणे, ही दिलासादायक बाब असली, तरी लघु प्रकल्पांमधील ५२.९४ टक्के साठ्यावर ग्रामीण भागाची भिस्त आहे..वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच शेतीसाठीच्या आवर्तनांवरही मर्यादा येऊ शकतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा १५ टक्क्यांनी अधिक असला, तरी मान्सून आगमनापर्यंत हा साठा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला आत्तापासूनच पाणी कपातीचे किंवा उपसा बंदीचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. विशेषतः वाशी (३२.७३ टक्के), लोहारा (४१.५९ टक्के) यांसारख्या कमी साठा असलेल्या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्यता असल्याने नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे..पाणीसाठा स्थितीप्रकल्प एकूण प्रकल्प उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) टक्केवारीसीना कोळेगाव १ ८४.६६० ६९.५३मध्यम १७ ११४.५७४ ६१.६९लघु २०८ २१९.३९४ ५२.९४एकूण २२६ ४१८.६२८ ५७.४४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.