Pune News: पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून डोंगरालगतच्या भागातील शेतकऱ्यांचे पिके धोक्यात आली आहेत. दिवे गावालगतच्या ओढ्यात काही प्रमाणात पाणीसाठा टिकून असला, तरी चिंचवले, दरा, टिळेकर मळा, गायकवाड मळा, काळेवाडी येथील किल्ला पायथा या भागांतील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी तातडीने सोडावे, अशी ठाम मागणी केली आहे..या परिसरात अंजिराची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. अंजिराचा ‘खट्टा’ बहर संपून सध्या ‘मिठा’ बहर सुरू झाला असताना पाण्याअभावी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. बहुतांश विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या तसेच शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ‘चालू पिकांना पाणी द्यायचे तरी कुठून’ असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे..Water Storage: निम्न दुधना धरणात ६३.५४ टक्के पाणी साठा.शेतकरी नीलेश झेंडे यांनी सांगितले, की आम्ही अगोदरच पाणीपट्टी भरण्यास तयार आहोत, मात्र पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतून दिवे परिसरात पाणी सोडण्यात यावे, अशी आमची मागणी आहे..विशेषतः दिवे परिसर हा योजनेच्या शेवटच्या टप्प्यात येत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाण्यासाठी अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, बुधवारी सकाळी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या उपविभागीय अधिकारी भाग्यश्री चवणे यांनी दिवे येथील पंपहाऊसला भेट देत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी दिवे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीत शेतकऱ्यांनी विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या..Water Management: भारतातील पाणी व्यवस्थापन : इतिहासातील चुका.योजनेतील एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती, शेकडो अनधिकृत जोड, बारानळ्या परिसरातील पाइपलाइन दुरुस्ती, जाधववाडी ते चिंचावले दरम्यानची लाईन वारंवार फुटणे, अशा समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच दिवे पंपहाऊस येथे नवीन पंप बसविण्याबाबत अनेक दिवसांपासून घोषणा करण्यात येत असल्या, तरी प्रत्यक्षात हे काम अद्याप सुरू झाले नसल्याची नाराजीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली..नवीन पंप बसविण्याचे काम योजना बंद असलेल्या काळात होणे अपेक्षित होते. मात्र आता काम सुरू होण्यापूर्वी दिवे परिसरात किमान एक आवर्तन तरी पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी अनेक अडचणींचा पाढा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला..आवश्यक ती दुरुस्तीची कामे करून मागणीनुसार लवकरच दिवे परिसरात पाणी सोडले जाईल.भाग्यश्री चवणे, उपविभागीय अधिकारी, पुरंदर उपसा जलसिंचन योजना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.