Maharashtra Agriculture : पंढरपूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीसमोरील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाच्या भरवशावर उभी केलेली पिके आता पाण्याअभावी सुकू लागली असून, अनेक ठिकाणी उसाची खालची पाने वाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे..तालुक्यातील अनेक भागांत विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांवर अवलंबून राहून पिकांना पाणी देण्याची कसरत सुरू आहे. पावसाचा खंड वाढल्याने विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, बोअरवेलमधूनही मर्यादित पाणी उपलब्ध होत आहे. .Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.पावसाच्या खंडाचा थेट फटका शेतीला बसत असल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत..Dry Spell Monsoon: पंधरा दिवसांपासून पावसाची दडी.कृषी विभागाने पिकांची स्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे..शेतीसाठी मोठा खर्च करून पीक उभे केले आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे उत्पन्न चांगले येईल अशी आशा होती; मात्र आता पावसाने पाठ फिरवल्याने विहिरी-बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. उपलब्ध पाणी किती दिवस पुरेल, याची चिंता सतावत आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर उत्पादनावर मोठा परिणाम होईल. शासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करावी.- युवराज भागवत यादव, शेतकरी, तावशी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.