Akola News: यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ३ कोटी ८७ लक्ष रुपयांच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मान्यता दिली आहे. या आराखड्यात एकूण २१७ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यातील १८८ गावांसाठी या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत..जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन विविध तालुक्यांतील गावांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे..Water Scarcity: देशातील मोठ्या जलाशयांतील पाणीसाठा घसरला; सध्या केवळ ७१ टक्के पाणी उपलब्ध.त्यानुसार अकोला तालुक्यातील १६, बार्शिटाकळीतील ४९, बाळापूरमधील ११, पातूरमधील ५०, मूर्तिजापूरमधील २४, अकोटमधील १८ तसेच तेल्हारा तालुक्यातील २० गावांचा या आराखड्यात समावेश आहे. .Water Scarcity: नांदी गावात हिवाळ्यातच पाणीटंचाई.आराखड्यातील उपाययोजनांमध्ये विहीर अधिग्रहणाच्या १२९, विहीर खोलीकरणाच्या ९, नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या ११, विंधन विहिरींच्या ४५ तसेच कूपनलिकांच्या २३ कामांचा समावेश आहे. या सर्व उपाययोजनांद्वारे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, हा मुख्य उद्देश आहे..सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रशासन सज्जमान्यता मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांना या कामांचे सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वेळेत उपाययोजना राबवून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.