Jalgaon News: खानदेशातील जलसाठा आजघडीला एकूण ७१ टक्क्यांपर्यंत आहे. जलसाठा या महिन्यात झपाट्याने घटला आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा, धुळ्यातील पांझरा, अनेर प्रकल्पातील पाण्याचा वापर सुरू झाला आहे. .कारण रब्बीसाठी त्यातून पाणी देण्यात आले आहे. मोठी शहरे, उद्योगांनाही पाणी दिले जात आहे. यामुळे पाणीवापर वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणात यंदा १०० टक्के जलसाठा होता. या धरणातून उद्योगांसाठी दोन वेळेस पाणी देण्यात आले आहे..Water Stock : लघु प्रकल्पात ५८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा.तसेच रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, नाशिकमधील मनमाड या शहरांसह काही गावांच्या पाणी योजनादेखील गिरणा नदीवर अवलंबून आहेत. यामुळे या धरणातून रब्बीसाठी यंदा पाणी देण्यात येत आहे. धरणातील जलसाठा सुमारे ७८ टक्के एवढा आहे. या धरणाची साठवण क्षमता सुमारे १८ टीएमसी आहे. हे धरण खानदेशात सर्वात मोठे असून, ते यंदा १०० टक्के भरल्याने पाण्याची समस्या राहणार नाही..जळगाव जिल्ह्यातील जामनेरातील वाघूर व तापी नदवरील भुसावळनजीकचे हतनूर हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. दोन्ही प्रकल्पांची साठवण क्षमता नऊ टीएमसी एवढी आहे. या प्रकल्पांतूनही उद्योग, शहरांसाठी पाणी दिले जात आहे. त्यांचा जलसाठाही घटला असून, वाघूरचा जलसाठा सुमारे ८३ टक्के, तर हतनूरचा जलसाठा सुमारे ८१ टक्के एवढा आहे..Water Storage: नांदेडमधील प्रकल्पांत ८५ टक्के पाणीसाठा शिल्लक.वाघूरमधून जामनेर व जळगाव शहर, उद्योगासाठी पाणी देण्यात आले आहे. तसेच जळगाव, भुसावळातील रब्बीसाठीही दोन वेळेस आवर्तन सोडण्यात आले आहे. सुमारे पाच हजार हेक्टरवरील रब्बीला या धरणाचा लाभ होतो. जळगाव जिल्ह्यात रावेरातील मंगरूळ, अभोडा, सुकी, यावलमधील मोर व गारबर्डी, जामनेरातील तोंडापूर , चोपड्यातील गूळ हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. या प्रकल्पांतील जलसाठादेखील ८० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे..धुळ्यातील शिरपुरातील अनेर, साक्रीमधील पांझरा, तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज, हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. पांझरा प्रकल्पातून धुळे शहरास पाणीपुरवठा केला जातो. त्यातील जलसाठाही घटला आहे..हतनूर, वाघूरमधून सतत उपसाहतनूर धरणातून भुसावळ शहर, भुसावळातील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव येथील आयुध निर्माणी व जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणात ५४ टक्के गाळ आहे. यामुळे जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. तसेच रावेर, यावल व चोपड्यातील रब्बी हंगामासाठी दोन वेळेस या धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.