Rural Distress: वाडा तालुक्यातील ४० गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यामुळे संतापाची भावना असून २० तारखेपर्यंत मुबलक पाणी मिळाले नाही तर पंचायत समितीवर मोर्चाचा ‘श्रमजीवी’ने इशारा दिला आहे..उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे..Rural Water Crisis: किल्लारीत नागरिकांना टँकरची प्रतीक्षा.अनेक गाव-पाड्यांपर्यंत टँकर पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. विशेषतः महिला, मुलांना पाण्यासाठी दररोज वणवण भटकावे लागत असून आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे; पण प्रशासनाकडून अपेक्षित गतीने.Rural Water Crisis: ग्रामीण भागातील पाणी शुद्ध आहे का?.उपाययोजना होत नसल्याने संतापाची लाट आहे. प्रशासनाने मागण्यांची पूर्तता केली नाही तर सोमवारी (ता. २०) वाडा पंचायत समितीवर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत..टँकरद्वारे अनियमित पाणीपुरवठाश्रमजीवी संघटनेने गंभीर समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी अपुरा, अनियमित आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त पाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू करणे, टँकरची व्यवस्था करणे, प्रलंबित कूपनलिकांची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.