Water Conservation: राज्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. या उपक्रमामुळे गोड्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, पुनर्वापराद्वारे सुमारे ३० टक्के पाणी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.