Farmer Issues: शासनाकडून कर्जमाफीसह विविध योजनांचा दिलासा दिला जात असला तरी प्रत्यक्षात हजारो शेतकरी अजूनही सावकारांच्या जाळ्यात अडकलेले असल्याचे वास्तव पुढे आले आहे. बँकिंग प्रक्रियेतील अडथळे, कागदपत्रांची गुंतागुंत आणि वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकऱ्यांना शेवटी खासगी सावकारांचा दरवाजा ठोठवावा लागत आहे. .जिल्ह्यातील आठही तालुक्यांत एकूण १४० परवानाधारक सावकारांची नोंद असून त्यांच्या माध्यमातून सुमारे ४७००.३२ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. यात आर्वी तालुक्यात १३ सावकारांकडून ४६.६८ लाख, आष्टीत ७ सावकारांकडून ४७०.३२ लाख, देवळीमध्ये २७ सावकारांकडून २०२२.०७ लाख, कारंज्यात १० सावकारांकडून ९९६.३४ लाख, समुद्रपूरमध्ये ४ सावकारांकडून २३० लाख, सेलूमध्ये ११ सावकारांकडून ३.२५ लाख, वर्धा तालुक्यात ५३ सावकारांकडून ९६६.४९ लाख, तर हिंगणघाटमध्ये १५ सावकारांकडून १७८.१४ लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. अधिकृत आकडेवारीत हे चित्र असले तरी प्रत्यक्षात अवैध सावकारांचे जाळे अधिक मोठे असल्याची चर्चा आहे..Loan Settlement Scheme: थकबाकी निवारण योजना राज्य बँकेकडून जाहीर.बँकांकडून कर्ज मिळविण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने अनेक शेतकरी हंगामी गरजांसाठी तातडीने सावकारांकडून कर्ज घेतात. पीक कर्जासाठी साधारणतः २ टक्के, तर तारण कर्जासाठी सुमारे १२ टक्के व्याज आकारले जात असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात यापेक्षा अधिक दराने व्याज वसूल केल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत जाऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक अडचणीत सापडत आहेत..Crop Loan: पीक कर्ज भरण्याची तारीख ३१ मार्च ऐवजी ३० जून करा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी.४२ हजार ४२० शेतकऱ्यांनी घेतले कर्जजिल्ह्यातील सुमारे ४२ हजार ४२० शेतकऱ्यांनी ४७ कोटी ७० लाख २९ हजार रुपयांचे सावकारी कर्ज घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात अनेक शेतकरी बँकिंग यंत्रणेतून बाहेर पडून सावकारांवर अवलंबून राहिल्याचे दिसून येते. शेतीवरील वाढते खर्च, अनिश्चित उत्पादन आणि बाजारातील अस्थिर दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. दरम्यान, जास्त व्याज आकारणीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र सावकारी नियंत्रण अधिनियम २०१४ नुसार अनधिकृत सावकारी केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास व ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. तरीही ग्रामीण भागात सावकारांचा प्रभाव कायम असल्याने शेतकरी या चक्रातून मुक्त होऊ शकलेले नाहीत..वर्धा जिल्ह्यात २ हजार ६५० आत्महत्यावर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या २५ वर्षांत २ हजार ६५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणा, उत्पादनातील अनिश्चितता आणि आर्थिक ताण यामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे..सावकारी कर्जवाटपाचा तालुकानिहाय आढावा (लाख रुपये)आर्वी ः १३ सावकार : ४६.६८आष्टी ः ७ सावकार : ४७०.३२देवळी ः२७ सावकार : २०२२.०७कारंजा ः १० सावकार : ९९६.३४समुद्रपूर ः ४ सावकार : २३०.००सेलू ः ११ सावकार : ३.२५वर्धा ः ५३ सावकार : ९६६.४९हिंगणघाट ः १५ सावकार : १७८.१४एकूण : १४० सावकार : ४७००.३२ लाख रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.