Mumbai News: अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे समुद्री वाहतूक आणि विमा खर्च वाढल्याने भारतातून तांदळाची निर्यात मंदावत आहे. वाढलेल्या खर्चामुळे निर्यातदारांना जहाजांची व्यवस्था करणे कठीण होत असल्याचे पाच निर्यातदारांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले..जगातील तांदूळ निर्यातीमध्ये ४० टक्क्यांहून अधिक वाटा भारताचा आहे. थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या तीन देशांच्या एकत्रित निर्यातीपेक्षाही भारताची निर्यात जास्त असते.वाहतूक दर झपाट्याने वाढत असल्याने खरेदीदार आणि विक्रेते दोघेही चिंतेत आहेत. त्यामुळे नवीन निर्यात करार करण्याचा वेग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे, असे ओलाम अॅग्री इंडिया कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले..‘वाहतुकीचे दर रोज वाढत आहेत. जहाज कंपन्या युद्ध अधिभार आणि इमर्जन्सी फ्युएल सरचार्ज (EFS) लावत आहेत. त्यामुळे आयातदारांसाठी माल खरेदी करणे अधिक महाग होत आहे,’ असे गुप्ता म्हणाले..Basmati Rice Export: भारतीय बासमतीला अमेरिकेतून मिळाली ५ हजार टनांची ऑर्डर.ओमानच्या आखाताजवळील होर्मूझ सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाल्यापासून समुद्री विमा आणि वाहतूक दर वाढले आहेत. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेलाची वाहतूक होते. या मार्गातील अडथळ्यांमुळे जहाजांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे (बंकर फ्युएल) दर वाढले आहेत..सध्या नॉन-बासमती तांदूळ निर्यातदार जुने करार पूर्ण करत आहेत आणि बंदरात उभ्या असलेल्या जहाजांवर माल चढवण्याचे काम सुरळीत सुरू आहे. मात्र नवीन ऑर्डरसाठी वाहतूक व्यवस्था करणे कठीण होत असल्याचे सत्यम बालाजी या तांदूळ निर्यात कंपनीचे कार्यकारी संचालक हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले..Rice Exports: इस्रायल- इराण युद्धामुळे बासमती तांदूळ निर्यातीला फटका, भारतीय निर्यातदार चिंतेत.‘आयात करणाऱ्या देशांकडे सध्या पुरेसा साठा आहे आणि काही माल अजूनही मार्गात अडकलेला आहे. त्यामुळे खरेदीदारांकडून घाईगडबडीने खरेदी होत नाही. परिस्थिती स्थिर होण्याची ते वाट पाहत आहेत,’ असे अग्रवाल म्हणाले..भारत प्रामुख्याने नॉन-बासमती तांदूळ बांगलादेश, बेनिन, आयव्हरी कोस्ट, गिनी आणि कॅमेरून या देशांना निर्यात करतो. तर उच्च प्रतीचा बासमती तांदूळ प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराक, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांकडे पाठवला जातो..पश्चिम आशियातील इराण, इराक, कतार आणि सौदी अरेबिया या प्रमुख बाजारपेठांकडे जाणाऱ्या भारतीय बासमती तांदळाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कारण होर्मूझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जहाजे अडकून पडली आहेत, असे नवी दिल्लीतील एका निर्यातदाराने सांगितले..‘माल कधी उतरवला जाईल किंवा पैसे कधी मिळतील याबद्दल निर्यातदारांना काहीच स्पष्टता नाही,’ असे त्यांनी सांगितले.या वर्षी भारतातील तांदूळ उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. निर्यातदार मुकेश जैन यांनी सांगितले, की देशात निर्यातीसाठी पुरेसा तांदूळ उपलब्ध आहे आणि रुपयाच्या घसरणीमुळे निर्यातीला काही प्रमाणात फायदा होत आहे. मात्र वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे नवीन निर्यात करार करण्यात अडथळे येत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.