Raigad News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने तालुक्यातील शेतकरी सध्या भातकापणीच्या कामात व्यग्र आहेत. यंदा ९० दिवसांच्या भातपिकाची कापणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, काही ठिकाणी एकाच दिवशी कापणी व मळणीचे काम उरकले जात आहे..यावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरले. मुसळधार पावसामुळे भातपिके आडवी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भात भिजल्याने उत्पादनात घट झाली आहे. .Paddy Harvesting : उन्हाळी भातशेती कापणीला वेग .दरम्यान, पावसाचा भरोसा नसल्याने आणि अजूनही हलक्या सरींची शक्यता असल्यामुळे शेतकरीवर्ग दिवसा उन्हातान्हात भातकापणी करण्यासाठी राबताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर वाढती मजुरी ही आणखी एक समस्या बनली आहे..Paddy Harvesting : भात कापणीसाठी लगबग सुरू.मजुरांची टंचाई असल्याने जादा मजुरी देऊन काम करून घेतले जात आहे. वाढती महागाई, खतांचे आणि बी-बियाण्यांच्या वाढत्या दरांमुळे शेती परवडत नाही, तरीही अनेक शेतकरी परंपरेने शेती टिकवून ठेवत आहेत..उघडिपीमुळे दिलासाशेतकरी संतोष पाटील यांनी सांगितले, की या वर्षी भातपिक जोमाने आले होते; परंतु पावसाने सर्व पीक आडवे केले. आता थोडी उघडीप मिळाल्याने कापणी सुरू केली आहे. मजुरी महाग असली तरी पीक वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. .शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पावसाच्या अनिश्चिततेने बळीराजाचे आयुष्य नेहमीप्रमाणे कठीण बनवले असले तरी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिद्दीचा आणि मेहनतीचा प्रवास मात्र अविरत सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.