Jalgaon News : खानदेशात ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नाही. शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरुस्त होत आहेत. दिवसा फक्त साडेपाच ते सहा तास वीज शेतीपंपांना मिळत आहे. दुसरीकडे रोहित्रदेखील खराब झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याची गरजही आहे. .पुढे रब्बी हंगाम किंवा आगाप रब्बीला सुरुवात होणार आहे. सध्या केळी, कलिंगड, पपई व अन्य पिकांत विद्राव्य खते देण्यासाठी कृषिपंप दोन-तीन दिवसाआड शेतकरी सुरू करीत आहेत. परंतु वीजपुरवठा व्यवस्थित नाही. वीज वितरण कंपनी मात्र खंडित वीजपुरवठ्याबाबत मौन बाळगून आहे. कुठलीही सकारात्मक कार्यवाही याबाबत केली जात नाही. पावसाळा सुरू असतानाही वीजपुरवठ्याची समस्या आहे. .Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम.खते ड्रीपमधून देण्यासाठी शेतीपंप सर्वत्र सुरू केले जातात. पण वीजपुरवठ्याची समस्यादेखील समोर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गावठाणासाठी किमान २० तास, तर शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याची तरतूद आहे; परंतु निर्धारित वेळेत सुरळीत वीजपुरवठा अनेक भागांत होत नाही. शेतीला दिवसा फक्त साडेपाच ते सहा तास वीज मिळत आहे. .अनियमित वीजपुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठा यंत्रणेवरही जाणवतो. मध्येच वीज कंपनीचे कर्मचारी, अधिकारी तांत्रिक काम हाती घेऊन वीजपुरवठा बंद करतात. धुळे, जळगाव व नंदुरबारमधील सर्वच भागांत शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा केला जात असून, ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहेत. .विजेच्या लपंडावामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती न सुधारल्यास शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये.वारंवार वीजपुरवठा खंडितशहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, जळगाव, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, साक्री, धुळे आदी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असतो. रब्बी हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने विहिरी, कूपनलिकांमधून पिकांना पाणी देण्यात येईल. सर्वच कृषिपंप सुरू होतील. अनियमित वीजपुरवठा, वारंवार बदलणारा विजेचा दाब यामुळे शेतीपंप खराब होत होण्याची समस्याही आहे..रोहित्रे झाली खराबवीजपुरवठा यंत्रणेत अनेक रोहित्रे नादुरुस्त, तर काही कायमस्वरूपी बंद असल्याचे दिसत आहे. वीजतारांची अवस्थाही भीषण आहे. बऱ्याच जागी या तारा लोंबकळल्या असून, काही ठिकाणी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र त्यांच्या दुरुस्तीची तसदी वीज कंपनी घेत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.