Thane News : पावसाचा हंगाम संपल्यानंतरही शहापूर तालुक्यात गेले काही दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील भात आणि नाचणीच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. शनिवार (ता. २५) रात्रीपासून सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने दुसऱ्या दिवशीही तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले, ज्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. .भातपिकाचे २० हजार हेक्टर आणि नाचणीचे १२ हजार हेक्टर, अशा एकूण ३२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने रविवारी दुसऱ्या दिवशीही झोडपून काढले आहे.पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक शेतातच कुजून गेले आहे. कापणी करून वाळत घातलेल्या भाताला कोंब फुटू लागले आहेत, तर काही ठिकाणी भाताची पेंडी पाण्यात तरंगताना दिसत आहे. .Unseasonal Rain : रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा.खळ्यांमध्ये रचून ठेवलेले पीकही ओलसरपणामुळे सडू लागले आहे. तर भिवंडीतील शेतकरी शिवाजी राऊत यांनी माहिती दिली, की अवकाळी पावसाचे पंचनामे झाले आहेत; परंतु शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी आहे. .दसरा ते दिवाळी या काळात शेतकरी शेतात पिकलेले भात कापून, सुकवून घरी नेत असतात; मात्र यंदा दसऱ्यानंतर आणि दिवाळीदरम्यान अवकाळी पावसाने अनेक वेळा हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेल्या भातात पाणी शिरले आहे.शेतात कापून ठेवलेले भात आता पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या पावसाने भातपिकावर रोग आला होता, तर आता भातपीक पाण्यात सडणार आहे..Unseasonal Rain : कसमादे परिसराला अवकाळीचा तडाखा.पंचनाम्यात घोळ ?पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झाले नाहीत. विशेष म्हणजे, महसूल कर्मचाऱ्यांनी गावात केवळ एकाच शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन, त्याच निकषात आणि एकाच अंदाजात सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे..असहकाराची भूमिकामहसूल कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरीवर्ग कृषी आणि महसूल विभागाला सहकार्य करणार नाही, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत..नाचणी पिकाला फटकाडोंगराळ आणि आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या नाचणीलाही मोठा फटका बसला आहे. माळ आणि मोरोशी परिसरात पाऊस झाल्याने नाचणीची कणसे ओलाव्याने काळवंडू लागली असून, कणसांतील दाणे खराब होण्याची शक्यता वाढली आहे..पशुपालन व्यवसायावर परिणामपरतीच्या पावसामुळे पशुपालन व्यवसायही अडचणीत आला आहे. शेतात कापलेला भात आणि त्याचा पेंढा (जनावरांचा चारा) पूर्णपणे भिजला आहे. ओला पेंढा सडू लागल्याने तो जनावरांना वापरणे कठीण झाले आहे, ज्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.