Uran News: अवकाळी पावसामुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. भातपीक गमावल्याने शेतकरी मदतीची आस लावून बसला आहे, मात्र संकटकाळात सहकार्य करण्याऐवजी उरण तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. .मराठवाड्यानंतर अवकाळी पावसाने कोकणात धुमाकूळ घातला आहे. कापण्यासाठी तयार झालेले भातपीक शेतीत पाणी तुंबल्याने चिखल झाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे पिकाची काढणी कठीण झाली आहे. अनेक ठिकाणी भातपिकाच्या लोंब्याना अंकुर फुटल्याने हाती आलेले पीक नामशेष झाले आहे. .Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा झोडपले.या अस्मानी संकटात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे शासकीय आदेश दिले गेले आहेत, पण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनाप्रमाणे पंचनामे करून शेतकऱ्यांची अवहेलना केली आहे..Rain Crop Damage : बर्दापूरसह परिसरात मुसळधार पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान.उरणमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी कृषी खात्याचे अधिकारी एका ठिकाणी बसून सोपस्कार करत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे भातपीक पूर्णतः नामशेष झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आहे. भाताचा पेंढा कुजून गेल्याने गाय-बैलांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. .अधिकाऱ्यांना घरी बसवा !भातशेती परवडत नसतानाही उरण पूर्व विभागातील अनेक शेतकरी भातशेती करीत आहेत, पण पावसाच्या अवकृपेने खाडी विभागातील शेतीबरोबरच डोंगर पट्ट्यातील भातशेतीचे अक्षरशः मातेरे केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांना घरी बसवा, असा संताप शेतकऱ्यांमध्ये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.