Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात सोमवारी (त. २३) पहाटे आणि सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात, प्रामुख्याने तुळजापूर आणि लोहारा तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढून ठेवलेल्या रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. .दरम्यान, सोमवारी सायंकाळीही शहरासह काही भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली. ढग दाटून आल्याने काढणीच्या कामाला लागलेले शेतकरी चिंतातूर झाले आहेत..Unseasonal Rain: गारपीट, वादळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा; तातडीने मदतीची मागणी.सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा काढणीची कामे वेगात सुरू आहेत. अनेक ठिकाणी हरभरा काढून शेतातच ढीग लावून ठेवले आहेत; मात्र, सोमवारी पहाटे अचानक पाऊस सुरू झाल्याने हा माल भिजून खराब होऊ नये,.Unseasonal Rain: धारूर, वडवणीत पावसाचा धुमाकूळ.यासाठी शेतकऱ्यांची प्लॅस्टिक कागदाने पीक झाकण्यासाठी मोठी धावपळ उडाली. पावसामुळे काढणीच्या कामातही व्यत्यय आला आहे. लोहारा तालुक्यात पावसाचा प्रामुख्याने जेवळी, वडगाव, आष्टाकासार आणि धानोरी परिसरात पावसाने हजेरी लावली. .तुळजापूर तालुक्यात तुळजापूर शहरासह जळकोट आणि आसपासच्या ग्रामीण भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. धाराशिव शहरासह परिसरातील भागातही हलका शिडकावा झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.