Ratnagiri News : सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या पावसाने भात कापणीत व्यत्यय आला आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीने शेतकरी बेजार झाला असतानाच हाता-तोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी बळीराजाची तारांबळ उडालेली आहे. .रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील काही भागांमध्ये अधूनमधून पडणाऱ्या सरींनी कापणीच्या कामाचा खोळंबा झालेले आहे. भात कापणीचे नियोजन बिघडल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामातील भाजीपाला लागवडीवर होणार आहे..गणेशोत्सवानंतर, नवरात्रोत्सवामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली नव्हती. नवरात्रोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतल्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून भात कापणीला जोमात सुरुवात झाली होती. परंतु ऐन दिवाळीत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे गणितच कोलमडले आहे. .Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग .मागील दोन दिवस सायंकाळी पाऊस पडत होता. हे वेळापत्रक ओळखून शेतकरी सकाळी भात कापणी करत होते आणि दुपारी कापलेलं भात वाळवून सायंकाळी झोडणी करत होते. या नियोजनावर पावसाने पाणी फेरले आहे. आज सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्यामुळे भात कापणीला सुरूवात केली..Paddy Harvesting : सिंधुदुर्गात २५ हजार हेक्टरवर भात पिकाची कापणी पूर्ण.पण त्यांचा अंदाज फोल ठरला आणि हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. दुपारी अचानक आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. .त्यामुळे कापलेलं भात भिजून गेले आहे. काहींनी कापून, वाळवून उडवी करून ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यांनाही फटका बसला आहे. या गोंधळात मेहनत वाया जात असून भातशेतीचेही नुकसान होत आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.