Climate Impact: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, अहिल्यानगर, पाथर्डी, राहुरी, पारनेर तालुक्यांत बुधवारी (ता. १८) रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली. पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हासह हरभरा, मका, कलिंगड, खरबूज, आंबा, कांद्याला मोठा फटका बसला आहे. अजून दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..जिल्ह्यातील बऱ्याच भागात बुधवारी (ता. १८) रात्री अवकाळी पाऊस झाला. दुपारपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. अहिल्यानगर तालुक्यात देहरे, नांदगाव, शिंगवे, राहुरी तालुक्यातील बांबोरी, ब्राह्मणी व परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. शिंगवे येथील गुलाब गंगाधर पाटील यांच्या अडीच एकर कलिंगडाचे तर निखिल जाधव यांच्या अडीच एकर कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. .Unseasonal Rain: साक्री तालुक्यात गारपीट.पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील कोरडगाव, पाणी, जळगाव, भुतेटाकळी, कोळसांगवी, औरंगपूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसासोबत वेगवान वाऱ्याच्या झोतांमुळे शेतातील उभी पिके आडवी पडली. या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. अकोले तालुक्यातील राजुर, भंडारदरा परिसराला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे..Unseasonal Rain: राज्याला अवकाळीचा तडाखा, १,४०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज.पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ आणि परिसरात तसेच अहिल्यानगर तालुक्यातील गावांत पावसाने नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीने काढणीला आलेल्या गव्हासह हरभऱा, मका, कलिंगड, खरबुज, आंबा, कांद्याला मोठा फटका बसला आहे. अजून दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंबा व इतर फळबागांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडांवरील फुलोरा व लहान फळे वाऱ्यामुळे गळून पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याचेही आढळून आले..त्यामुळे येणाऱ्या हंगामावर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वादळी वाऱ्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. जनजीवनही काही काळ विस्कळीत झाले. शेतकऱ्यांनी अचानक झालेल्या पावसामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..बुधवारी रात्री अचानक जोरदार पाऊस, वादळी वारे आणि प्रचंड गारपीट झाली. यामुळे अडीच एकर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले आहे. आमच्या भागात अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे, शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी.- निखिल जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.