Unseasonal Rain Crop Damage Maharashtra News Updates: राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्याने शेतपिके उद्ध्वस्त झाली आहेत. गहू, मका आणि ज्वारीसारखी उभी पिके आडवी झाली आहेत. कांदा पिकालाही मोठा फटका बसला. टोमॅटोच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने 'जगायचं कसं?' असा आर्त सवाल शेतकऱ्यांना केला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे..भंडारा जिल्ह्यातील ७५ गावांना अवकाळीचा फटकाभंडारा जिल्ह्याला बुधवारी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने झोडपले. येथील ८८१ शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील ७५ गावांतील मका, आंबा आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वाधिक नुकसान लाखांदूर तालुक्यात झाले आहे. येथील ३०२ हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. .कळमना बाजार समितीत धान्यांची पोती भिजलीनागपुरात अवकाळी पावसामुळे कळमना बाजार समितीत उघड्यावर ठेवलेली धान्यांची पोती भिजली. सध्या गहू पीक काढणी सुरु आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात धान्याची आवक झाली आहे. पण अपुऱ्या शेडमुळे गव्हाची पोती उघड्यावर ठेवावी लागली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्व धान्याची पोती भिजली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गहू पावसात भिजल्यामुळे फुगला आहे. यामुळे त्याला आता बाजारात योग्य भाव मिळणार नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. भिजलेला गहू खरेदी करण्यास व्यापारी टाळाटाळ करतात आणि यामुळे त्याचे भाव पडतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले..Unseasonal Rain: साडेबारा हजार हेक्टरला पाऊस, गारपिटीचा फटका .बाजार समितीत शेड अपुरी असल्याने पावसात गहू भिजला आहे. व्यापारी शेतमाल खरेदी करतात, पण तो दोन- दोन दिवस उचलत नाहीत. शेतमाल विकायला जागा मिळाली नाही. यामुळे पोत्यांच्या थप्प्या भिजल्या. गव्हासह हरभरही भिजला. यामुळे शेतकऱ्याला आता आत्महत्या करायची वेळ आली आहे, अशी व्यथा दिघोरी भागातील शेतकऱ्याने व्यक्त केली. .वराड शिवारात दाणादाण, मका, ज्वारी पिके अवकाळीने उद्ध्वस्तअवकाळीने उत्तर महाराष्ट्रालाही झोडपले. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने धरणगाव तालुक्याच्या वराड शिवारात दाणादाण उडाली. येथील गहू, मका आणि ज्वारीचे उभे पीक आडवे झाले. मुख्यतः काढणीला आलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले. मका, गहू, ज्वारी, बाजरी, कांदे आदी पिकांनाही मोठा फटका बसला..Unseasonal Rain: जोरदार पावसासह गारपिटीचा दाणादाण.टोमॅटोच्या बागा जमीनदोस्तधाराशिव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. येथील कळंब तालुक्याच्या बहुला शिवारात टोमॅटोच्या बागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. कळंबसह वाशी, तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यावर अवकाळीचे संकट कोसळले. .लातूर जिल्ह्यातही अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, यासह आंबा बागांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पडझड झाली..शेतकरी हताशपुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने चारा पिकांसह कांदा, ज्वारी, बाजरी आणि गव्हाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हताश झाला आहे. येथील चांडोह जांबूत कवठे परिसरातही शेतीमालाचे नुकसान झाले. .चाकण बाजार समितीत कांदा भिजलाएकीकडे इराण- इस्रायल युद्धामुळे देशातून होणारी शेतमालाची निर्यात ठप्प झाली आहे. त्यात आत दुसरीकडे अवकाळीने संकट ओढवले. पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांदा आणि बटाटा भिजून खराब झाला. हा शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. या बाजार समितीत शेतमाल साठवणुकीसाठी अपुरी जागा आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा पावसात भिजला. शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेली कांद्याची माती झाली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.