Raigad News : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या मारा, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या भाताची नासाडी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि भातकापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. .बळीराजा आपल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून अवकाळी, परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. .Unseasonal Rain : अवकाळीने नाशिकच्या पश्चिम भागाला झोडपले.यंदादेखील पावसाच्या भीतीपोटी उरलेसुरले भात पावसाची विश्रांती मिळताच पदरात पाडून घेण्यासाठी मेहनतीने प्रयत्न करीत असताना शेतकरीवर्ग दिसून येत आहे. त्यातच पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. .Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग.दाणेदार कणीस, मोत्यासारखे धान जमीनदोस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने कापणीसाठी तयार ठेवलेले धान भिजून चिखलात बसले आहे..पावसाबरोबर आलेल्या वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात भातपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागातर्फे नजर पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.