Buldana News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनाम्यामध्ये करून त्याचे चावडी वाचन करून घ्या, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना या वेळी दिला..जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित भागांची जाधव यांनी शनिवारी (ता. २३) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत प्रशासनातील अधिकारी यांच्यासह माया म्हस्के, गजानन मोरे, विलास घोलप, भास्कर राऊत, शरद हाडे, पंडित देशमुख, शंतनू बोंद्रे, एकनाथ जाधव, अरविंद माने, अंकुश पाटील, डॉ. सपकाळ आदी उपस्थित होते..Rain Crop Damage : पिके पिवळी पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे. नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केले आहे. परंतु शेतकऱ्यांनीसुद्धा नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने करून नुकसानीची नोंद तपासून पहावी..Rain Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात सलग पावसामुळे शेतीचे नुकसान.पंचनाम्यांचे चावडी वाचन करून घ्यावे, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ मदत देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केली. .या वेळी जाधव यांनी चिखली शहरातील माळीपुरा भागातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यानंतर तालुक्यातील सोमठाणा, उत्रदा, पेठ, बोरगाव काकडे, पांढरदेव, भोरसा भोरसी या गावांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.