Bhima River: वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे शेती पिकांच्या पाण्याची मागणी वाढली असून, उजनी धरणातील पाणीसाठा वेगाने खाली जात आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी सोडले जाणार असल्याने, साधारणपणे १० ते १५ मे दरम्यान उजनी धरण उणे पातळीत जाईल, असा अंदाज लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने वर्तविला आहे..सध्या उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन आणि उपसा वाढला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ८३.५४ टीएमसी आहे, तर त्यापैकी उपयुक्त साठा १९.६७ टीएमसी (३७.६२ टक्के) आहे. सध्या ३९९० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. .Ujani Dam Water Release: उजनीचे पाणी आळगे-खानापूरमार्गे हिळ्ळी बंधाऱ्याकडे.जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्राला उजनीचे पाणी मिळते. सध्या शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यांसह, बोगदा, सीना-माढा आणि दहीगाव उपसा सिंचन योजनांमधून पाणी सुरू आहे..Ujani Dam Water Discharge : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढवला.साधारण शेतीचे हे पाणी ३० मेपर्यंत सुरू राहणार आहे. पण पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा विचार करता, एप्रिलअखेर भीमा नदीत साडेपाच टीएमसी पाणी सोडले जाईल, असे सांगण्यात आले. विविध योजनांमुळे धरणातील साठा दररोज अर्धा टीएमसीने कमी होत आहे..दुसरीकडे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे नियोजन प्रशासनाने केले आहे. धरण उणे ३२ टक्क्यांच्या खाली गेल्यास जुनी पाइपलाइन बंद पडते, मात्र नवीन समांतर जलवाहिनीमुळे दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.