Solapur News : उजनी धरण क्षेत्रात पावसाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धरणाच्या सांडव्यातून सोमवारी (ता. १५) भीमा नदी पात्रात तब्बल १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला..सकाळी सव्वा नऊच्या सुमारास १५ हजार क्युसेकचा सुरु असलेला विसर्ग थेट १ लाख क्युसेकवर वाढवण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..Dam Water Release : दारणा, गंगापूर, पालखेड धरणांतून विसर्गात घट.उजनी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सतत जोरदार पाऊस होत असून, दौंडकडून ७ हजार क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत आहे. परिणामी धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. .उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पावसाचा जोर व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. .Dam Water Release : जायकवाडी धरणातून थांबविलेला विसर्ग पुन्हा सुरू.त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच नदीकाठी ठेवलेली जनावरे किंवा साहित्य तत्काळ हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे..उजनी धरणातील सोमवारची पाणी पातळीपाणीपातळी : ४९७.२६५ मीटरएकूण पाणीसाठा : १२२.४८ टीएमसीउपयुक्त साठा : ५८.८२ टीएमसीपाण्याची टक्केवारी : १०९.७९%.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.